• 106
  • 1 minute read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रेरिकांनाही भाऊबीज मिळावी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रेरिकांनाही भाऊबीज मिळावी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रेरिकांनाही भाऊबीज मिळावी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी

 

मुंबई, १० : अंगणवाडी कर्मचाऱ्यांप्रमाणे बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त केलेल्या प्रेरीकांना (सीआरपी) दिवाळी भाऊबीज भेट देण्याची मागणी महाराष्ट्र श्रमिक सभा या संघटनेने केली आहे.

       बचत गटांची चळवळ राज्यभर पसरली असून या गटातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी उमेद अभियानाअंतर्गत सरकारने प्रेरीकांची (सीआरपी) नियुक्ती केली आहे. या प्रेरीकांना राज्य सरकारतर्फे अवघे ६,००० रुपये मानधन देण्यात येते. त्यातही विविध कारणे पुढे करून कपात करण्यात येते.

   राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतीस यांच्या मानधनात लक्षणीय वाढ केली आहेच, शिवाय त्यांना दिवाळीत भाऊबीज भेट म्हणून दरवर्षी दोन हजार रुपये देण्यात येतात. यावर्षीही अशी भाऊबीज देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे.

   अंगणवाडी सेविकांप्रमाणेच प्रेरीकांचे कामही महत्वाचे आहे. बचत गटातील महिलांमध्ये उद्योजकता निर्माण करण्याचे काम प्रेरीका करीत असतात. अगदी गावविकासाचा आराखडा तयार करण्यातही त्यांचा सहभाग असतो.

   त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या बरोबरीने त्यांना मानधन मिळावे, तसेच दिवाळीला भाऊबीज भेट मिळावी, अशी महाराष्ट्र श्रमिक सभेची मागणी आहे. समाजातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महोदय प्रेरीकांनाही आपण न्याय द्याल, असा विश्वास आहे.

     यावाबत दिवाळीपूर्वी निर्णय व्हावा, अन्यथा राज्यभरातील प्रेरीकांना आपल्या मागण्यांसाठी ऐन दिवाळीत आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असे महाराष्ट्र श्रमिक सभेचे अध्यक्ष प्रभाकर नारकर व सरचिटणीस केतन कदम यांनी म्हटले आहे .

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *