• 127
  • 1 minute read

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

चाण्या,चूणचूण्या,बोटी,डल्लीवर पोसलेला पँथर खरच गो बळी झालाय.
त्यानं आपली मूंडी गाईच्या जबड्यात दिलीय.

गाय आता गवत खात नाही.
ती झालीय नरभक्षक झूंडबळी घेणारी.
गाय जरी खात असेल चारा तरी.
गाईच्या रक्षणासाठी मारला जातो अखलाक.

मेलेल्या गाईच्या अंतेष्ठीसाठी उनाव मधल्या
अस्पृश्यांच्यापोरंठोरांची फरपटत काढली जाते धींड.
मारला जातो पहलूखान गाय तस्कर म्हणून.

गाईने मध्यंतरी म्हणे गो रक्षक वाघाचीही शिकार केली.
पँथरला चळचळा कापायचे म्हणे गायधनी.
पँथरचा बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठेची गोठे.

कधी काळी गो रक्षकही द्यायचे यज्ञात गाईची आहूती.
मिटक्या मारत खायचे यज्ञात भाजलेले गाईचे मांस.

पण,यज्ञातली लूट थांबवली म्हणून
त्यांचे साम्राज्य लयाला गेले.
गो मांस भक्षक गो रक्षक झाले.
त्यांनी गाईला गोमाता केले.
उदरात तिच्या ३३कोटींना कैद केले.
गोमुत्राने पापे धूवायला सुरुवात केली.
शेण खावून ग्यान पाजळायला सुरुवात केली.

ती पवित्र गाय खाणे महापाप.
याच जन्मी तुम्हाला गोबळी करणारी.
गाय हंबरे गोठ्यात माणूस मरणाच्या दारात.

त्याच गाईच्या सागूत्यावर पोसलेला पँथर
गाईच्या जबड्यात मान देवून मानाच्या भिकेवर जगतोय.
स्वत:ची मान गाईच्या जबड्यात देवून
पँथर असल्याची बतावणी करतोय.

त्या बतावणीत व्हायचं का नाचे?
पँथरचं कातडं पांघरुन रेशीम बागेत ६१-६२ कवायत करणारे.

मग नाचु नका,झूकु नका. वाकू नका.
मणका मोडला तरी गाईची शिकार होवू नका.
पन्नाशीतल्या पँथरमधला ‘लढवय्या’ गुलाम होवू देवू नका.

– जयवंत हिरे
(दलित पँथरच्या पन्नाशी निमित्त)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *