• 37
  • 3 minutes read

पुण्यात छत्रपतींचा पुतळा बसूच नये म्हणून भटानी केलेला विरोध

पुण्यात छत्रपतींचा पुतळा बसूच नये म्हणून भटानी केलेला विरोध

पुण्यात छत्रपतींचा पुतळा बसूच नये म्हणून भटानी केलेला विरोध
प्रश्न…

छत्रपती शिवाजी महाराजांचा “जगातील सर्वात पहिला पुतळा” कोणी, कुठे व केव्हा बसवला…?

राजर्षी शाहू महाराजांनी इ .स. १९१७ मध्ये पुणे शहारातील “भांबुर्डी”(शिवाजीनगर पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याबाबत शिवप्रेमीजनांची बैठक बोलावली होती.

या विरोधात पुण्यातील ब्राम्हण पंडितांनी मोर्चा काढून त्या बैठकीवर दगडफेक केली.

याशिवाय शाहू महाराज ज्या जागेवर थांबले होते, तिथे रात्रीच्या वेळी सनातनी ब्राह्मणी मनुवाद्याच्या चिथावणीवरून काही ब्राम्हण पंडीत तरूणांनी दगडफेक केली, आग लावून देण्याचा प्रयत्न केला.

“पुणे शहरात शिवरायांचा पुतळा बसू नये” हा पुणेरी पंडितांचा नारा होता.

“शाहू महाराजांना शिवाजीबद्दल एवढेच प्रेम असेल तर, तो पुतळा कोल्हापुरात बसवावा.” असा ठराव ब्राम्हण पंडितांनी पुण्यातील सभेत पास केला.

पण, भटांचा विरोध न जुमानता “शाहुमहाराज” “स्मारक समिती”चे अध्यक्ष झाले.

“कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा हा जगातील पहिला पुतळा ठरणार होता.”

म्हणून, भांबूर्डी येथील(आजच्या शिवाजीनगर छत्रपती शिवाजी महाराज सैनिक शाळेच्या प्रांगणात) हा पुतळा उभारण्याचे ठरवले.

निधी जमू लागला..। इ.स. १९२१ मध्ये शिवरांयाच्या पुतळ्याचे पुजन, चौथारा व भुमीपुजन झाले.

पुतळ्यांचे नकाशे आराखडे चित्र तैयार करण्यात आले.

त्यानुसार पुतळे बनावणारे कारागीर शोधले,
पण सर्वच कारगीरांना पुण्यातील ब्राम्हण पंडितांनी दम भरला, धमक्या दिल्या. त्यातही एक दोन कामगारांनी होकार दिला होता.
पण, त्यातच ६ मे १९२२ ला शाहू महाराजांचे निधन झाले.

मग ग्वाल्हेरचे “जिवाजीराव शिंदे” यांना समितीचे अध्यक्ष केले.

त्यांनी काही कारागीर बोलवले…
त्यांना अॅडव्हॉन्सही दिला, पण तेही पुणेरी पंडितांच्या भितीने काम सोडून पळून गेले.

शेवटी “करमरकर” नावाच्या एका मुर्तीकाराचा शोध लागला.

त्याने सर्व काम करुन देण्याची हमी घेतली.

पण, पुण्यातील पंडितांनी त्याला खुप त्रास दिला, तेव्हा तो पुणे सोडून मुंबईला गेला व जिवाजीराव महाराजांना भेटून, त्यांने काम सुरू केले.

स्मारक समितीने करमकरांना सर्व मदत केली.

काम सुरू झाले, पण एवढा मोठा पूतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या भट्टया नव्हत्या, म्हणुन समितीने इंग्रज सरकारकडे त्याबाबत मदत मागितली.

तेव्हा मुंबईचे इंग्रज गव्हर्नरने (त्यांचे नांव रिचार्डसन् क्रूडास यांनी) फांऊड्रीमध्ये सर्व व्यवस्था करून दिली.

सुमारे दोन वर्ष हे काम चालले व एकूण १२ तुकडयामध्ये हा पुतळा पूर्ण झाला.

हे सर्व अवजड तुकडे मुंबई वरून पुण्याकडे घेवून जाण्याची सोय नव्हती.

इंग्रजांची मुंबई-पुणे रेल्वे सेवा सुरु झाली होती.

इंग्रज शासनाने विशेष मालगाडीची व्यवस्था करुन पुतळा पुण्यास पोहचून देण्याची जबाबदारी ऊचलली.

त्यावेळी पुण्यातील ब्राम्हण पंडितांनी त्या विरोधात इंग्रजांना पत्र लिहले.

“शिवाजी महाराजाचा पुतळा पुण्यात बसवणे हा ब्राह्मणांचा अपमान आहे, सरकारने त्यास मदत करू नये.”

इंग्रजांनी पुणेरी पंडितांचे ऐकले नाही व इ.स.१९२७ मध्ये पुतळ्याचे सर्व भाग पुण्यात पोहचले.

कडवट भटांनी मुंबई पुणे गाडीही तीन ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला होता.

ते सर्व भाग जोडण्याचे साहित्य होते. ते आणण्यात आले, सतत सात महिने कांम सुरू होते.

पुणरी पंडितांनी दगाफटका करू नये म्हणून चोवीस तास मराठा, बहुजन, दलित, शिवप्रेमी तरुणांचा खडा पहारा होता.

इंग्रज व पोलिसांचे पूर्ण सहकार्य होते.

तरीही, पुणेरी ब्राह्मण पंडितांचा त्रास सूरूच होता.
त्यांनी लोहार, जोडारी यांना खूप त्रास दिला.

त्याच दरम्यान “पुतळा अनावरण” समितीने इंग्लंडच्या राजपुत्र सर लेस्ली विल्सन यांना शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उदघाटनाला पाचारण केले.

त्यांनी येण्याची तयारी दर्शवली तेव्हा याच पुणेरी पंडितांनी इंग्लंडच्या राजपुत्रास तार करून कळवले, “कार्यक्रमास येवू नये.”

पुणेरी पंडितांनी शिवरायांच्या पुतळ्याच्या विरोधात मोर्च काढले… निवेदन दिले… दंगली घडवल्या…।

पण, इंग्रज मागे हटायला तैयार नव्हते.

अनावरणाची तारीख ठरली.
राजपुत्र मुंबईस उतरून पुण्यास येणार, असे ठरले.

पुणेरी पंडितांनी मुंबईला जाऊन राजपूत्राला “काळे झेंडे” दाखवले.

“कार्यक्रम रद्द करावा” म्हणून निवेदन दिले.

पण, राजपुत्राने ते फेटाळून लावले.

#तरी पुण्यातील कडवे ब्राह्मण पंडीत हरले अथवा सरले नाहीत,
त्यांनी प्रत्येक पंडितांच्या घरावर काळे झेंडे लावले व राजपुत्र ज्या रस्त्याने येणार आहेत, त्या रस्त्यावर काळ्या रांगोळ्या काढल्या.

पुणे नगरपालिका पूर्णपणे पंडितांच्या ताब्यात होती.

त्यामुळे सर्व पंडीत नगरसेवक व नगर अध्यक्ष एक झाले…।

त्यांनी स्वखर्चाने ठिकठिकांनी रांगोळ्या, निषेध, फलक लावले.

शिवाय, पुणे शहरात बंद जाहिर केला..।

म्हणजे बाहेरून येणाऱ्या शिवप्रेमीची ताराबंळ झाली पाहिजे,

“पाणीपुरवठा ही दोन दिवस बंद ठेवला.”

“हॉटेलही बंद ठेवले व हॉटेल मालकांनी कोणालाही पाणी देखील पाजु नये, असा दम भरला.”

इंग्रज सरकार असुनही पंडितांनी इंग्रजांना जुमानले नाही.

समारंभात शिवरायांच्या पुतळ्याखाली बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रयत्न झाले.

पण, जागरूक बहूजन-मराठा-शिवप्रेमींमुळे ते शक्य झाले नाही.

शेवटी दि. 16 जून 1928 रोजी, “छत्रपती शिवरायांचा जगातील पहिला पुतळा” (भांबूडी) म्हणजे शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाला.

ब्रिटनचे राजपुत्र “सर लेस्ली विल्सन” यांचे शुभहस्ते व “महाराज जीवजीराव शिंदे” यांचे अध्यक्षतेखाली हा समारंभ पार पडला.

ग्रामिण भागातून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश येथून हजारो शिवप्रेमी या समारंभात सहभागी झाले होते.

याशिवाय, देशभरातून सुमारे ५६५ प्रतिनिधी उपस्थीत होते.

पुणेरी पंडितांनी पुकारलेल्या ‘पुणेबंद’ मुळे अन्न-पाण्याविना सर्वाचे हाल झाले.

संस्थेने उपाय योजना केली होती, पण ती अपुरी पडली.

इंग्रजांच्या काळातील इ. स. १९२८ ची हि घटना आहे.

तर मग विचार करा, ‘पेशवाईच्या काळात’ हे पुणेरी ब्राम्हण पंडित किती मस्तवाल झाले असतील.

“ज्या विकृत मानसिकतेतुन पंडितांनी हा प्रकार केला, त्यांचेच वंशज आज शिवभक्त, शिवशाहीर झालेत.” हे महाराजांची बदनामी छुप्या पद्धतीने करत असतात

कारण तुमच्या प्रेरणादाई आदर्शना बदनाम केलं की तुम्हाला गुलामगिरीच्या जोखडात बंधयला सोप्प जात

पण, हे ‘फेक’ शिवभक्त, शिवशाहीर आजही शिवाजी, संभाजी या महापूरूषांची नावे आपल्या मुलांना लावत नाही की ठेवत नाहीत.

तर मित्र हो, सत्य आसे किती ही दडपले तरी, सत्य आज नाहीतर उद्या समोर येतेच

म्हणून तमाम शिवप्रेमी बहुजनांनी इतिहास जाणून घेतला पाहिजे. जाणून घेऊन समजून घेतला पाहिजे आणि इतरांनाही समजून सांगितला पहिजे
कारण…..

– “जो समाज आपला इतिहास विसरतो, त्यां समाजाला इतिहास धडा शिकवतो …!!”

0Shares

Related post

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

‘वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक : जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध करणार मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश…
“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग…

“एक राष्ट्र, एक निवडणूक” हे तर ”राष्ट्रिय स्वंय संघा”च्या छुप्या अंजेड्याचा एक भाग… “एक राष्ट्र एक…
“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

“संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे,

विषय: “संविधान मंदिर” ही संकल्पना चुकीची आहे, मंदिर हा शब्ध वगळावे . संविधान जागराचे सर्वंकष धोरण…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *