• 131
  • 1 minute read

भाजपाला डॉ.बाबासाहेब बद्दल काय प्रेम उतु चालल ?

भाजपाला डॉ.बाबासाहेब बद्दल काय प्रेम उतु चालल ?

भाजपा आर एस एस ने देश चालवितांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांना तिलांजली दिली,दिल्लीत भाजपाचे समर्थक कार्यकर्त्यांनी संविधान जाळले,भाजपाचे पदाधिकारी जाहीर भाषण करता की,,,हमे ४००पार संविधान बदलनेके लिये मंग रहे,,, ह्या बाबतीत देशाचे केअर टेकर प्रधानमंत्री चकार शब्द काढत मोदीजींचे चुप रहाणे म्हणजेच मुक संमती आहे
काल,मुळ राष्ट्रवादी चे आमदार जितेंद्र आव्हाड आंबेडकरी विचारांचे प्रेरक आहेत त्यांनी मनुस्मृतीची प्रतिमा फाडतांना चुकुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असलेले पोष्टर फाडले गेले व त्या बाबत त्यांनी जाहीर माफी मागितली ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनादर करणार नाहीत जे राज्यातील जाणकार नागरिकांना माहित आहे
परंतु भाजपाची आई मुख्य जननी मनुवादी,मनस्मृती,आर एस एस विचार धारेचा विरोध आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला ते मुळ पोटदुखी भाजपाची आहे मग चुकुन भावनेच्या भरात पाडलेल्या पोष्टरचा एवढा बाऊ करण्याची भाजपाला राजकारण करून आंबेडकरी समाजाच्या भावना कशा दुखावतील व सामाजिक उद्रेक कसा होईल हा एकमेव उद्देशाने आज भाजपा व त्यांचे सहकारी यांनी जे कृती केली त्यास आंबेडकरी समाजातील सज्ञान लोक नागरीक अनुयायी कधीच प्रतिसाद देणार नाही
व आंबेडकरी समाजाने ह्या बाबीवर कधीच भाजपाचे राजकीय खेळीत अडकु नये
दिल्लीत जंतरमंतर वर संविधान जाळले तेव्हा भाजपाने का निषेद केला नाही ?? मोदीजी,अमीत शहाजी एकही शब्द का बोलले नाही??? त्या लोकांना वर देशद्रोहा अंतर्गत गुन्हा दाखल करून का अटक केली नाही???ह्या प्रश्नाचे उत्तर भाजपा कडे आहे का,तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रती एवढेसेही प्रेम नाही जितेंद्र आव्हाड ची झालेली नजरचुकीला का राजकीय रंग दिला जातो ?

– हरिचंद्र अण्णा लोंढे
( धुळे,आंबेडकरी कार्यकर्ता )

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *