• 168
  • 1 minute read

भान

भान

ते सत्तेत
आहेत
हे सत्य आहे
हे मान्य केले
पाहिजे

सर्व जगात
पोहचलेल्या
बुद्धालाही
त्यांनी केले होते
अदृश्य या भूमीत

त्या तुलनेने
संविधान
त्यांच्यासाठी आहे
हातचा मळ!
म्हणून आम्ही
उगीच भ्रमात
राहू नये

आमच्या कवितेतील
सूर्य, चंद्र नि तारे
उपाशी मरू लागले
की तेही जातील
शरण त्यांना
बिनशर्त!
(किंवा जमा होतील
कबरीत)
आठवले,
कवाडे नि जाधव
जसे गेले

शब्दातील मुजोरीने
कुणीच जिंकले नाही
युद्ध आजवर
युद्धाचे रथचक्र
रक्ताच्या इंधनावर
चालत असते
याचे भान असावे
अन् उद्या होणा-या
तुंबळ युद्धासाठी
जोडत जावे माणसं
आपल्या मनातील
भिंती पलीकडचे.

– प्रा माधव सरकुंडे.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *