मनुस्मृती दहन दिन

मनुस्मृती दहन दिन

मनुस्मृती दहन दिन

आज दिनांक २५ डिसेंबर, खऱ्या अर्थाने स्री मुक्ती व बंधूता दिवस. भारतीय बंधूत्वाचे व अखंडत्वाचे जतन करून, त्यास वृद्धिंगत करा. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी अमानवीय धर्मग्रंथ, मनुस्मृती, चे जाहीर दहन केले.  चुल, मुल व भोगवस्तू समजल्या जाणाऱ्या स्त्रीला, तसेच अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या पशुहूनी जीवन जगणाऱ्या मानवाला मनुस्मृतीच्या भयावह जोखंडातून मुक्त केले.   भारत देश स्वतंत्र झाल्यावर, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला बुद्ध शिकवणूकीवर आधारित माणसाला माणूसपण बहाल करणारे स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायावर आधारित मानवतावादी संविधान लिहून, देशात माणसाला माणूसपण बहाल करणाऱ्या बंधूत्वाची पाया भरणी केली. परंतू, काही मुठभर मनुवादी, हिंदू व हिंदुत्वाच्या नावावर भारतीयांना भावनिक करून, पुन्हा मनुस्मृती लादू पाहत आहेत व देशातील बंधूता जात व धर्माच्या नावावर नष्ट करू पाहत आहेत. अशा देश विघातक, मनुस्मृती लादू पाहणाऱ्या मनुवादी औलादीचा डाव हाणून पाडा व भारतीय संविधानाचा व भारतीयत्वाचा बचाव करा.   मी प्रथमतः आणि अंतिमतःही भारतीयच आहे, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश ध्यानी ठेवून, भारतीय बंधूत्वाचे व अखंडत्वाचे जतन करा.  

प्रकाश डबरासे 

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *