• 51
  • 1 minute read

महापरिनिर्वाण दिनी महापालिका करतेय व्यवसाय!

महापरिनिर्वाण दिनी महापालिका करतेय व्यवसाय!

महापरिनिर्वाण दिनी महानगरपालिका करतेय व्यवसाय!

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो लोक चैत्यभूमी येथे अभिवादनाला येत असतात या अभिवादनास येणाऱ्या लोकांच्या सेवेसाठी जेवणाचे, पाण्याचे, विविध उपक्रमांचे, पुस्तकांचे स्टॉल , मंडप लागतात, शिवाजी पार्क येथे असलेले सामान्य स्टॉल हे पुस्तक विक्रीचेच असतात असे नाही तर अनेक स्टॉल हे विविध सेवाभावी उपक्रमांचे, संविधान, कायदेविषयक जन जागृती, शिक्षण विषयक जागृती, आर्थिक विषयी जागृती, आरोग्य विषयी जागृतीचे स्टॉल असतात जे कोणताही मोबदला न घेता सेवा देत असतात.

 
 चैत्यभूमी परिसरात व छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे लागणाऱ्या स्टॉल च्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा भाव सोडून यावर्षी व्यवसाय करू इच्छिते आहे. येथील प्रत्येक छोट्या स्टॉल साठी किमान रुपये 5118₹ आकारले आहेत. ज्या स्टॉल साठी दर वर्षी महानगरपालिका व डेकोरेटर यांचे मिळून एकूण २००० रुपये द्यावे लागत होते तिथे महानगरपालिका यांनी 5118 रुपये आकारले आहेत. ५०० च्या वरती स्टॉल लागतात ५०० जरी स्टॉल पकडले तरी 25,59000रुपये होतात. म्हणजेच महानगरपालिका महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनातून आंबेडकरी अनुयायींन कडून लाखो करोडो रुपये कमवू इच्छिते…
एवढे पैसे जर आकारले जात असतील तर महापरिनिर्वाण दिनासाठी असलेला फंड गेला कुठे? हा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही…
 
 
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *