• 163
  • 1 minute read

विवाह ठरविण्याची सर्वोत्तम पद्धती

विवाह ठरविण्याची सर्वोत्तम पद्धती

परिचयोत्तर विवाह : लेखांक : १

विवाह ठरविण्याची सर्वोत्तम पद्धती

★★★★★★★★★★★★★★★★★★★

‘ऑनर किलिंग’साठी ‘सैराट’ हा परवलीचा शब्द बनून प्रत्यही वारंवार घडू लागलेल्या उमलत्या वयातील तरूणाईच्या हत्या सवयीचा भाग होऊन एक सामाजिक बधिरता येऊ घातलीय.

समाजमाध्यमात अशा हत्यांचे समर्थन करण्यापर्यंत काही लोक गेले आहेत, याचे आश्चर्य वाटायला नको. कारण, कुठलाही सामाजिक अपराध हा त्या समाजातील लक्षणीय संख्येच्या सुप्त इच्छेचा अविष्कार असतो. उदाहरणार्थ, दलित-मुस्लिम व स्त्रियांवरील अत्याचार हे समाजात खोलवर रुजलेल्या दलित-मुस्लिम व स्त्रियांच्या द्वेषाचे प्रक्षेपण असते.

अशा हत्या झाल्या की उमटलेला निषेधाचा सूर हवेत विरुन जातो व उपायांचे कुणीही बोलत नाही.

खरेतर जातीबाहेर लग्ने आता लक्षणीय संख्येने होऊ लागली आहेत. फक्त ती दलित-सवर्ण अशी झाली की स्फोटक बनतात. सवर्णासवर्णात झाली तर स्वीकारली जातात.

ही बहुतांश तरूणाईने स्वतः ठरविलेली लग्ने असतात. ती मुख्यत: दोन प्रकारची असतात. एक, फिल्मी प्रेमाच्या प्रभावातील सवंग प्रकार तर दुसरा परिचयोत्तर एकमेकांना अजमावत थोडा प्रगल्भ जाणीवेचा प्रकार. पहिला प्रकार अतिव भावनिकच असल्याने कालांतराने कलहाचा विषय होतो. तर दुसरा प्रकार प्रगल्भतेमुळे यशस्वी होतो.

आजच्या घडीला, हा दुसरा म्हणजे परिचयोत्तर विवाह प्रकार सर्वोत्तम आहे. त्यात जातीचा विचार प्राधान्याने येत नसल्याने गळून पडतो व तो खऱ्या अर्थाने दोन समंजस जीवांनी घेतलेला सहजीवनाचा निर्णय ठरतो.

ही परिचयोत्तर विवाहाची संकल्पना अधिक विस्ताराने समजून घेऊ पुढील लेखात.

– किशोर मांदळे, पुणे

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *