• 82
  • 1 minute read

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या,
चतुर तुझा वैरी रे,
डाव त्याचे जाण गड्या…

वैरी तुझा आग लावी,
त्यात तुला झोकी गड्या,
सवे तुझ्या रडे तो ही,
खरे खोटे जाण गड्या,
रात्रच नाही, दिवसही,
वैऱ्याचा आहे गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तू ठेव गड्या…

बरी नाही उग्र भावना,
घाल तया आवर गड्या,
हाणून पाड दुष्ट डाव,
फसू नको त्यात गड्या,
नको कलह अंतरी,
शुध्द तर्क लाव गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या….

येती जाती वादळे जीवनी,
क्षणिकचे सारे गड्या,
गैर ओंजळ कुचकामी,
भले नाही त्यात गड्या,
भीम-बुध्दाचा वारस तु,
ताठ उभा रहा गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या…

कवीः प्रकाश डबरासे
(३० मे २०२४)

0Shares

Related post

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.

महाराष्ट्रात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गैर महायुती-गैर आघाडी सर्व पक्षांनी एकत्रित लढवाव्यात.    महाराष्ट्रात नुकत्याच…

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे ….. आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी

संपत्तीचे केंद्रीकरण, उत्पनांच्या साधनांचे विकेंद्रीकरण न होणे: आणि व्हेलॉसिटी ऑफ मनी अर्थव्यवस्थेतील श्रीमंत / उच्च /…
मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ?

मोदी राजवट स्थिरावण्यामागे भारतीय अर्थव्यवस्थेत होणारे कोणते बदल हातभार लावत आहेत ? गेल्या दहा वर्षात भारतीय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *