• 152
  • 1 minute read

सेन्सेक्स आणि जगभरातील इतर शेअर मार्केट निर्देशांक वाढत आहेत.

सेन्सेक्स आणि जगभरातील इतर शेअर मार्केट निर्देशांक वाढत आहेत.

शेयर बाजारातील निर्देशांक वधारलेले राहत असतील म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था खूप चांगले काम करत असली पाहिजे असे समीकरण आपल्या डोक्यात बसविले गेले आहे. ते चुकीचे आहे.

      दारू पिऊन झिंगलेल्या माणसाला आपण सरळ रस्त्यावरून चालत आहोत की कड्यावर उभे आहोत याचे भान नसते.

तसेच काहीसे शेयर मार्केट निर्देशांकांचे सुरू आहे.

सामान्य नागरिक म्हणून आपण बघत होतो वाचत आहोत की जागतिक व्यापार, भूराजनैतिक संबंध, विनिमय दर आणि अर्थात अर्थव्यवस्था.. या सर्वांसमोरील आव्हाने गंभीर बनत आहेत. हे दीर्घकाळ सुरू राहू शकते.

जगातील सर्व प्रमुख शेअर निर्देशांकांना त्याची काही पडलेली दिसत नाही.

व्हॉलॅटिलिटी इंडेक्स (VIX) किंवा ज्याला भय निर्देशांक म्हणतात…. तो भारतामध्ये १०.५ म्हणजे ऐतिहासिक निचांकावर आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना भविष्याबद्दल फार भय किंवा अनिश्चितता वाटत नाहीये.

याचे खरे आर्थिक विश्लेषण असे आहे की यापैकी अनेक निर्देशांक…त्या शेअर बाजारातील संख्येनं कमी पण आकाराने महाकाय कंपन्यांच्या शेअर वर आधारित असतो.

उदा सेन्सेक्स मोठ्या ३० कंपन्यांवर तर निफ्टी ५० मोठ्या कंपन्यांवर

निर्देशांकातील या सर्व कंपन्या अजूनच मोठ्या होत आहेत भविष्यात अजून मोठ्या होणार आहे. त्याचे प्रतिबिंब सेन्सेक्स आणि निफ्टी वधारण्यामध्ये पडत आहे.

त्या देशातील एम एस एम इ किंवा शेती किंवा असंघटित क्षेत्र त्याचवेळी ( त्याचवेळी!) प्रचंड आर्थिक वाचितवस्थेतून जात असले तरी या मोठ्या कंपन्यांना म्हणून सेन्सेक्सला ओरखडा देखील उठणार नाहीये.

आपला मुद्दा वेगळा आहे. शेयर बाजारातील निर्देशांक वधारलेले राहत असतील म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था खूप चांगले काम करत असली पाहिजे असे समीकरण आपल्या डोक्यात बसविले गेले आहे. ते चुकीचे आहे.

निर्देशांक वाढत राहून त्या देशातील कोट्यावधी सामान्य नागरिकांचे दैनंदिन राहणीमान हलाखीचे असू शकते. प्रत्येकाने आपले आणि आजूबाजूच्या लोकांचे भौतिक प्रश्न कमी झाले आहेत व गंभीर बनले आहेत याची मनामध्ये नोंद घ्यावी. आणि आपले मत बनवावे

संजीव चांदोरकर

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *