• 117
  • 1 minute read

आमचाच क्रिकेट खरा क्रिकेट होता !

आमचाच क्रिकेट खरा क्रिकेट होता !

आम्ही लहानपणी क्रिकेटचे नियम फारसे माहीत नसताना जो क्रिकेट खेळायचो तो खरा जंटलमन क्रिकेट होता !
१) पहिल्याच चेंडूवर बाद झाला की आमचा फलंदाज हिरमुसला होई. मग वयाने आमच्यात थोराड (सिनियर नाही बरं का) असलेला मुलगा उदारपणे त्याला पूर्ण ओव्हर किंवा तीन ओव्हर खेळवायचा. त्यातही तो एक दोन वेळा पुन्हा बाद व्हायचा.
२) मग नियमच केला की तीन वेळा आऊट झाल्यानंतरच आऊट धरायचा ! खेळ आनंदासाठी आहे हे महान तत्त्व इतक्या लहान वयात आम्ही आत्मसात केले होते ते असे !
३) गोलंदाजी ज्यांना येत नाही त्यांनीही ती जशी जमेल तशी करायची परवानगी होती.
४) त्रिफळा वाऱ्याने पडला आहे की चेंडू लागून हे कधीतरी कळायचेच नाही. मग आम्ही संशयाचा फायदा देऊन आऊट धरायचो नाही.
५) आमच्या टीम मधल्या खेळाडूला गिरणीत दळण टाकायचे वॉरंट घेऊन त्याची आई आली तर आम्ही त्याला तेवढा वेळ मैदान सोडून जायची परवानगी द्यायचो. तो परत आला की त्याचा खेळ पूर्वलक्ष्यी प्रभावाने निरंतर चालू ठेवण्याची महत्त्वाची तरतूद आम्ही नियमावलीत केली होती !
६) असे अनेक कालसुसंगत बदल व दुरुस्ती आम्ही आमच्या क्रिकेटच्या घटनेत करायचो. आमची क्रिकेटची घटना अत्यंत लवचिक व खेळाचा आनंद वाढविणारी जगातील पहिली सर्वसमावेशक उदारता असलेली क्रीडा- घटना होती.
७) आमच्या संघात घरातून परवानगी घेऊन आलेले व गावावरून ओवाळून टाकलेले, ज्यांना परवानगीचे सोपस्कार करावे लागत नसे अशा सर्व प्रकारच्या मुलांचा समावेश असल्याने आमचा संघ सर्व समाजाचे व्यवस्थित प्रतिनिधित्व करायचा.
८) एखादी मुलगी आली तर लिंगभावी समतेचा अत्यंत स्वाभाविक पुरस्कार करून आम्ही तिलाही संघात घ्यायचो. (तिची बॅटिंग झाली की ती पळून जाणार आहे, हे माहित असूनही आम्ही पुन्हा पुन्हा फसायचो !)
९) आमच्या क्रिकेटवर कुणी जिंकण्या हरण्याची कधी बेट लावली नाही. जुगारमुक्त क्रिकेट देणारा तो आमचा जगातील एकमेव संघ होता.
१०) मॅच फिक्सिंग करण्याइतकी आमची नियत खराब नव्हती.
११) पैशासाठी तर आम्ही खेळतच नव्हतो ! आम्ही ‘खेळासाठी खेळ’ नाही तर ‘जीवनासाठी खेळ’ या जीवनवादी सौंदर्यशास्त्रातील महान तत्त्वाने खेळत होतो !

– किशोर मांदळे

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *