• 123
  • 1 minute read

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन

सहवासातले आठवले पुस्तकाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

मी तसा कुणाचाही नाही हस्तक
म्हणून माझ्यावर निघत आहे पुस्तक
माझे नेहमी शांत असते मस्तक अशी काव्यमय सुरुवात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवलेंनी केली.

डॉ बाबासाहेब नसते तर आम्ही कुठेच नसतो .आंबेडकरी विचारांवर निष्ठा ठेवून भारतीय दलित पँथर द्वारे आम्ही सातत्याने संघर्ष केला.त्या चळवळीत माझ्या सोबत असंख्य कार्यकर्ते जोडले गेले,ही जी कार्यकर्त्यांचे ताकद आहे तीच माझी संपत्ती आहे . कमावलेली माणुसकी आणि माणसं हीच माझी खरी संपत्ती आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.


वरळी येथील नेहरू तारांगण येतील एका सभागृहात काल शनिवारी दि.२९ जून रोजी रात्री सहवासातले आठवले या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास माजी केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,
आमदार प्रवीण दरेकर ,
शरणकुमार लिंबाळे , माजी मबत्री अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कसारे, पप्पू कागदे , श्रीकांत भालेराव उत्तम कांबळे राजेंद्र खरात नवनित लोंढे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ सौ.सीमाताई आठवले आणि आठवले कुटुंबीय उपस्थित होते.
तसेच रिपब्लिकन पक्षाचे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सहवासातले आठवले हे पुस्तक रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याबद्दल लिहिलेले अनुभव आहेत. त्याचे संकलन चंद्रमणी जाधव आणि प्रवीण मोर यांनी या पुस्तकात केले आहे.

= हेमंत रणपिसे

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *