• 88
  • 1 minute read

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि.13 ऑगस्टपासून 6 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले दि.13 ऑगस्टपासून 6 दिवसांच्या लंडन दौऱ्यावर.

          मुंबई दि.12 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे येत्या बुधवार दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता मुंबईतुन लंडनला रवाना होणार आहेत.त्यांच्या समवेत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे सुध्दा लंडन दौऱ्यावर रवाना होणार आहेत.
केंद्रीयराज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लंडन दौऱ्यात लंडन येथील भारतीय दुतावास येथे 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत.तसेच लंडन मधील विविध आंबेडकरी विचारवंत आणि कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेणार आहेत.लंडन मधील आंबेडकरी कार्यकर्ते गौतम चकवर्ती यांनी साऊथ हॉल आंबेडकर सेंटर येथे आयोजित केलेल्या स्वागत सत्कार समारंभात ना.रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत.तसेच दिनांक 18 ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतच्या वतीने लंडन मध्ये आयोजित केलेल्या कोहिनुर पुरस्कार सोहळ्यात ते उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यात आवर्जुन उपस्थित राहण्याचे आमंत्रण लोकमत समुहाचे प्रमुख विजय दर्डा यांनी ना.रामदास आठवले यांना दिले होते.या निमंत्रणाला मान देऊन ना.रामदास आठवले या पुरस्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

लंडन दौऱ्यात ना.रामदास आठवले पत्रकार,आंबेडकरी,कार्यकर्ते,उद्योजक आणि अनिवासी भारतीयांची ते भेट घेणार आहेत. या दौऱयात ना.रामदास आठवले यांच्या सोबत रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अविनाश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


हेमंत रणपिसे
प्रसिद्धी प्रमुख

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *