• 109
  • 1 minute read

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

चाण्या,चूणचूण्या,बोटी,डल्लीवर पोसलेला पँथर खरच गो बळी झालाय.
त्यानं आपली मूंडी गाईच्या जबड्यात दिलीय.

गाय आता गवत खात नाही.
ती झालीय नरभक्षक झूंडबळी घेणारी.
गाय जरी खात असेल चारा तरी.
गाईच्या रक्षणासाठी मारला जातो अखलाक.

मेलेल्या गाईच्या अंतेष्ठीसाठी उनाव मधल्या
अस्पृश्यांच्यापोरंठोरांची फरपटत काढली जाते धींड.
मारला जातो पहलूखान गाय तस्कर म्हणून.

गाईने मध्यंतरी म्हणे गो रक्षक वाघाचीही शिकार केली.
पँथरला चळचळा कापायचे म्हणे गायधनी.
पँथरचा बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठेची गोठे.

कधी काळी गो रक्षकही द्यायचे यज्ञात गाईची आहूती.
मिटक्या मारत खायचे यज्ञात भाजलेले गाईचे मांस.

पण,यज्ञातली लूट थांबवली म्हणून
त्यांचे साम्राज्य लयाला गेले.
गो मांस भक्षक गो रक्षक झाले.
त्यांनी गाईला गोमाता केले.
उदरात तिच्या ३३कोटींना कैद केले.
गोमुत्राने पापे धूवायला सुरुवात केली.
शेण खावून ग्यान पाजळायला सुरुवात केली.

ती पवित्र गाय खाणे महापाप.
याच जन्मी तुम्हाला गोबळी करणारी.
गाय हंबरे गोठ्यात माणूस मरणाच्या दारात.

त्याच गाईच्या सागूत्यावर पोसलेला पँथर
गाईच्या जबड्यात मान देवून मानाच्या भिकेवर जगतोय.
स्वत:ची मान गाईच्या जबड्यात देवून
पँथर असल्याची बतावणी करतोय.

त्या बतावणीत व्हायचं का नाचे?
पँथरचं कातडं पांघरुन रेशीम बागेत ६१-६२ कवायत करणारे.

मग नाचु नका,झूकु नका. वाकू नका.
मणका मोडला तरी गाईची शिकार होवू नका.
पन्नाशीतल्या पँथरमधला ‘लढवय्या’ गुलाम होवू देवू नका.

– जयवंत हिरे
(दलित पँथरच्या पन्नाशी निमित्त)

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *