• 583
  • 1 minute read

चंदा दो, धंदा लो या मोदीच्या गॅरंटीचा एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड…!

चंदा दो, धंदा लो या मोदीच्या गॅरंटीचा एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड…!

एअरटेल भागिदार बनलेल्या अदानी’ला करोडोंचा मलिदा !

अदानीने एअरटेलमध्ये भागीदारी मिळविताच एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड पडला असून रिचार्ज प्लॅनची किंमत किमान 100 रुपयांनी सर्वच प्लॅनमध्ये वाढली आहे. देशात एअरटेलचे 60 करोड ग्राहक असून वाढीव 100 रुपये प्रमाणे 600 करोड रुपये अधिकचा नफा आता एअरटेल अन AESL म्हणजे अदानी एनर्जी सोल्युशन लि. च्या तिजोरीत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या चंद्याची परतफेड करण्याची ही पहिली तातडीची कृती मोदींनी केली आहे. सर्व चंदावाल्यांना मोदींने गॅरंटी दिली आहे, त्यामुळे एअरटेलच नव्हे, आणखी काय काय भुर्दंडांचा सामना देशातील जनतेला करावा लागेल, हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. पण हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या गोर गरीब जनतेने मोदीला मतं दिली त्यांनी यासंदर्भात आता तरी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
सुनील भारती मित्तल परिवाराच्या मालकीच्या या एअरटेल कंपनीचे शेअर्स राजीव जैन यांच्या अमेरिका स्थित कंपनीने मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. अन आता अदानी ग्रुपच्या ” अदानी एनर्जी सोल्युशन लि. या कंपनीने यात भागीदारी घेतली आहे. अदानीच्या भागीदारीचे करार एअरटेलसोबत होताच एअरटेलने आपल्या प्लॅनचे दर वाढविले आहेत.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *