• 56
  • 1 minute read

जातीधर्मादि खोट्या अस्मितांच्या नशाखोरांसाठी!

जातीधर्मादि खोट्या अस्मितांच्या नशाखोरांसाठी!

ही गंभीर पोस्ट तरुणांना, तरुणांबाबत विचारप्रवृत्त करण्यासाठी आहे !

             दंगली, खऱ्या- खोट्या अस्मिता, खरे-खोटे इश्यू अशा कारणावरून रक्त काढणं , नेत्यांच्या पोलीस केसेस अंगावर घेणं , आयुष्य उद्ध्वस्त करून घेणं , दुसऱ्याला मारणं , स्वतः मरणं …. हे सर्व करण्याऱ्या लाखो लोकांसाठी , तरुणासाठी ! 
 
          जेव्हा एकटे असाल तेव्हा या पोस्टचा विचार करा , ग्रुप मध्ये विचार करू नका ! फक्त एकट्याने विचार करा , अधून मधून झुंडीच्या बाहेर या , कारण झुंडीत विचारशक्ती mute होते म्हणून ! 
__________________
 
            कोट्यवधी कष्टकरी – कामगार (ब्ल्यू कॉलर , व्हाईट कॉलर) सगळे कष्ट करतात. कशासाठी कष्ट करतात ? तर पैसे मिळवण्यासाठी !
 
          ते पैसे कशासाठी मिळवतात ? तर अन्नपाणी खाण्यासाठी , घरात जाऊन आवश्यक ती विश्रांती घेण्यासाठी , आजारी न पडण्यासाठी , तब्येत चांगली ठेवण्यासाठी, कष्ट करतांना लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी !
 
          तब्येत कशासाठी चांगली ठेवतात ? तर कष्ट करता यावेत म्हणून ! पुन्हा कष्ट कशासाठी करतात ? तर पैसे मिळवण्यासाठी ! ते पैसे कशासाठी मिळवतात ? तर ऊर्जेचे पुरुत्पादन करण्यासाठी !
 
        आणि हे असंच चालू आहे , महिन्यांमागून महिने , वर्षामागून वर्षे, आयुष्यभर !!
________________
 
            या साऱ्या वर्षात ते मुलांना जन्माला घालतात. मग त्या मुलांचं भरणपोषण करतात , त्यांना आजारी पडू देत नाहीत , त्यांना शिक्षण, कौशल्ये शिकवतात. 
 
हे सगळं कशासाठी ?
 
           तर ती मुलं उद्या प्रौढ झाल्यावर कष्ट करून पैसे कमावतील ! कशासाठी ? तर ऊर्जा मिळवण्यासाठी ; ऊर्जा कशासाठी तर कष्ट करण्यासाठी !
 
म्हणजे परत ऊर्जेचे पुनरुत्पादन करण्यासाठी ! 
 
            आणि हे चक्र देखील असंच चालू आहे , पिढ्यानपिढ्या ….. शेकडो वर्षे ! ! ! !
________________
 
           एखाद्याला वरकरणी वाटेल , काय लिहिलंय लहानमुलांसारखे ! हे सगळं आम्हाला माहित आहे , जे ऑब्व्हियस तेच लिहिले आहे. 
 
          पण तरुणांनो ! ही गंभीर पोस्ट तरुणांना, तरुणांबाबत विचारप्रवृत्त करण्यासाठी आहे ! 
 
             वर लिहिलेल्या चक्रातून कमीजास्त प्रमाणात प्रत्येक प्राणिमात्र जातो. ते खरं तर बायोलोजिकल चक्र आहे. ते सर्व जीवसृष्टीत आढळतं , प्राण्यांत आढळतं. 
 
          परंतु माणसात आणि इतर प्राण्यात मुलभूत फरक काय आहे ? हा फरक आहे माणसाचा मेंदू आणि त्यातून त्याला मिळालेल्या, त्यालाच माहित नसलेल्या प्रचंड क्षमता !!
 
             त्या क्षमतांचा वापर करून माणसाने एक प्रतिसृष्टी उभी केली आहे. संगीत , नृत्य, चित्रकला , नाटक , अनेकानेक कला ! या कला मानव स्वतः परफॉर्म करतो किंवा त्यांचा आस्वाद घेतो ! आणि शब्दाधारित कौशल्ये , अभ्यास , लाखो प्रकारचे चवीचे अन्नपदार्थ , आपल्याला आवडलेल्या तरुण / तरुणीबरोबर रोमांस , सेक्स , लग्न, घर वसवणे , सजवणे , जगभरची भटकंती  … ….. काही पाने भरतील , म्हणून थांबतो ! 
 
            लाखो वर्षाच्या उत्क्रांतीत जवळपास प्रत्येक स्त्री पुरुषाला, त्याच्या मेंदू, मन यातून प्रचंड क्षमता मिळाल्या आहेत. 
 
      पण जगातील कोट्यावधी स्त्री पुरुषांमधील किती स्त्री पुरुष त्या मिळालेल्या क्षमता वापरू शकतात ? 
 
          किती जण या क्षमता वापरू शकतात ? असतील एक टक्का ! चला दहा टक्के धरू !!
 
      मग तेच कसे वापरू शकतात ? इतर ऐंशी- नव्वद टक्यांकडे काय मेंदूची क्षमता नसते ? त्यांना नाही वाटत त्या दहा टक्यांसारखे जगावं म्हणून ? 
 
       वाटतं ना ! पण इच्छा असून ही माणसं आपल्या क्षमता वापरू शकत नाहीत. 
 
         असं का होतं ? 
 
         एकदाच नाही तर पिढ्यानपिढ्या असं होत राहतं. पण का ? 
    
           यावर विचार नाही करणार ? 
_______________
 
          जात , वंश , धर्म , भाषा , देश , प्रांत या माणसाने बनवलेल्या , मॅनमेड गोष्टी आहेत ! 
 
       त्यांच्याबाबत खऱ्या खोट्या अस्मिता , दुराभिमान यांचं नशापाणी तुम्ही केलं आहे ! 
 
       या नशापाण्यामुळे तुमची मनं बधीर झालेली आहेत ! 
 
     त्यामुळे या अशा प्रश्नांची बीजं मनाच्या मातीत रुजतच नाही आहेत !!
 
         ती मनं किमान काही काळासाठी रिफ्रेश कराल ? आणि वर मांडलेल्या प्रश्नावर अंतर्मुख तरी व्हाल ? फक्त काही काळासाठी ?
 
संजीव चांदोरकर (११ जून २०२५)
 
 
 
 
 
0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *