• 56
  • 1 minute read

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान !

मी बँकेकडून बाजारभावाने कर्जे घेऊन शेअर मार्केट / रिअल इस्टेट / क्रिप्टो करन्सी च्या सट्टेबाजीत घालीन ;
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तर कर्जावरचे व्याज भरणार आहे !

शेती , एमएसएमई , सेल्फ हेल्प ग्रुप , लघुउद्योगांना कर्जे उपलब्ध होत नसतील तर माझा काय दोष ?
______

मी कालव्यातून पाणी घेऊन त्याची शीतपेये बनवीन नाहीतर बिअर ; किंवा पंचतारांकित किंवा माझ्या घरात स्विमिंग पूल
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने पाण्याचा भाव मोजायला तयार आहे

माणसांना , गुरांना , शेतीला पाणी कमी मिळाले तर माझा काय दोष ?
_______

मी शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेऊन, त्या काही वर्षे पाडून ठेवीन मग उद्योगांना / रियल इस्टेट कंपन्यांना चढ्या भावाने विकेन

तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने जमिनीचा भाव मोजायला तयार आहे (शेतकरी कर्जबाजारीपणामुळे डिस्ट्रेस सेल करत मिळेल त्या किमतीत देखील विक्री करतात – हे खरेतर ते सांगत नाहीत)

मी जमिनी दाबून ठेवल्यामुळे जमिनीचे भाव वाढणार असतील तर माझा काय दोष ?
______

मी हॉटेल मध्ये पदार्थ ऑर्डर केले आहेत ; मी खाईन नाहीतर तसेच टाकून देईन

तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तिथल्या लावलेल्या किमतीप्रमाणे बिल भरायला तयार आहे

लाखो लोकांना साधे पोटभर खायला मिळत नाही तर माझा काय दोष ?
_____

हे करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा व्यक्तिगत काहीच दोष नाही ; त्या जे काही करत आहेत ते एकतर प्रचलित कायद्याप्रमाणे करीत आहेत किंवा प्रचलित कायदे त्यांना आडकाठी करत नाहीत

प्रश्न विचारला पाहिजे : कायदे कोण बनवतो ? आणि ते तसेच का बनवतो ? कायदे बनवण्याची दुसरी पद्धत असूच शकत नाही का ? किंवा अगदी उघड उघड खटकणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करणारे कायदे कधीच का बनवले जात नाहीत ?
________

“प्रचलित” मार्केट तत्त्वज्ञान वस्तुमाल / मत्ता विकणार ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे , मग त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा , नाश करावा , किंवा पाडून ठेवावे किंवा दामदुपटीने अजून कोणाला विकावे.

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान अर्थकारणाचे सामाजिक , नैतिक , पर्यावरणीय , राजकीय पैलू असतात या जमिनी सत्याला माहित असून नाकारते ; स्वकेंद्री धनदांडग्यांची धन करणारे आर्थिक तत्वज्ञान आहे ते !

म्हणून अर्थव्यवस्थेबद्दल नाही सर्वसमावेशक “राजकीय अर्थव्यवस्थे”बद्दल बोलले पाहिजे.

सर्वात मूलभूत प्रश्न आहे…….तुम्ही / आपण जोरात बोलणार आहोत का ; “हो आम्हाला प्रॉब्लेम आहे “ !

वरील वाक्यात महत्वाचा शब्द आहे “प्रचलित”… मार्केट तर पुरातन काळापासून अस्तित्वात होती. एकविसाव्या शतकासाठी, तरुण आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्यासाठी जनकेंद्री आणि पर्यावरणकेंद्री पर्यायी मार्केट तत्त्वज्ञान हवे आहे. तरुणांनो यावर काम करा.

संजीव चांदोरकर (२५ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *