• 147
  • 1 minute read

भान

भान

ते सत्तेत
आहेत
हे सत्य आहे
हे मान्य केले
पाहिजे

सर्व जगात
पोहचलेल्या
बुद्धालाही
त्यांनी केले होते
अदृश्य या भूमीत

त्या तुलनेने
संविधान
त्यांच्यासाठी आहे
हातचा मळ!
म्हणून आम्ही
उगीच भ्रमात
राहू नये

आमच्या कवितेतील
सूर्य, चंद्र नि तारे
उपाशी मरू लागले
की तेही जातील
शरण त्यांना
बिनशर्त!
(किंवा जमा होतील
कबरीत)
आठवले,
कवाडे नि जाधव
जसे गेले

शब्दातील मुजोरीने
कुणीच जिंकले नाही
युद्ध आजवर
युद्धाचे रथचक्र
रक्ताच्या इंधनावर
चालत असते
याचे भान असावे
अन् उद्या होणा-या
तुंबळ युद्धासाठी
जोडत जावे माणसं
आपल्या मनातील
भिंती पलीकडचे.

– प्रा माधव सरकुंडे.

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *