• 211
  • 1 minute read

भान

भान

ते सत्तेत
आहेत
हे सत्य आहे
हे मान्य केले
पाहिजे

सर्व जगात
पोहचलेल्या
बुद्धालाही
त्यांनी केले होते
अदृश्य या भूमीत

त्या तुलनेने
संविधान
त्यांच्यासाठी आहे
हातचा मळ!
म्हणून आम्ही
उगीच भ्रमात
राहू नये

आमच्या कवितेतील
सूर्य, चंद्र नि तारे
उपाशी मरू लागले
की तेही जातील
शरण त्यांना
बिनशर्त!
(किंवा जमा होतील
कबरीत)
आठवले,
कवाडे नि जाधव
जसे गेले

शब्दातील मुजोरीने
कुणीच जिंकले नाही
युद्ध आजवर
युद्धाचे रथचक्र
रक्ताच्या इंधनावर
चालत असते
याचे भान असावे
अन् उद्या होणा-या
तुंबळ युद्धासाठी
जोडत जावे माणसं
आपल्या मनातील
भिंती पलीकडचे.

– प्रा माधव सरकुंडे.

0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *