• 134
  • 1 minute read

भारतीय समाजात सहजीवनी समुपदेशनाचे स्थान

भारतीय समाजात सहजीवनी समुपदेशनाचे स्थान

परिचयोत्तर विवाह : लेखांक : ५

“कपडा चांगला रंगविण्यासाठी आधी तो स्वच्छ धुतला पाहिजे.” – गौतम बुद्ध

येणारी पिढी ही पारंपरिक धारणांचा पगडा घेऊनच प्रौढ होते. या धारणांना सामाजिक विषमतेचे एक अटळ वास्तव आहे. भारतात ही विषमता जशी जातिव्यवस्थेच्या उतरंडीची आहे, तशीच ती लिंगभावी विषमता देखील आहे. ती प्राय: स्त्री-पुरुष विषमता आहे. पुरुषसत्ताक व्यवस्थेत फक्त पुरुषच ‘पुरुषी विचार’ करतात असे नव्हे तर अपरिहार्यपणे स्त्रियाही ‘पुरुषी’च विचार करतात.

हा पुरुषी विचार ब्राह्मणी पित्रुसत्ताक व विज्ञानद्रोही आहे. पूजाअर्चा व कर्मकांडात मश्गुल ठेवणारा आहे. म्हणून विज्ञान तंत्रज्ञान घेऊन आलेल्या प्रत्येक आक्रमकाने आमच्यावर सहज शेकडो वर्षे राज्य केले आहे. आजही करत आहेत. फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे.

बदलत्या व गतिमान वास्तवात विवाह जमविण्यातील समस्या जातवर्गीय पार्श्वभूमीनुसार भिन्न आहेत. कनिष्ठ मध्यमवर्गात त्या कमी असल्या तरी मध्यमवर्गापासून पुढे त्या जटील बनलेल्या दिसताहेत. त्यातही शहरी नोकरपेशा -व्यावसायिक व ग्रामीण शेतकरी कुटुंबातील समस्या पुन्हा भिन्न आहेत.
परिचयोत्तर विवाह चळवळ प्रथमतः शहरी मध्यमवर्गातच केंद्रित होईल व तिथे सफल झाली तर ग्रामीण शेतकरी कुटुंबापर्यंत जाईल.

मुलींना नोकरी-व्यवसायानिमित्त उपलब्ध झालेला बाहेरचा अवकाश हा त्यांच्या अपेक्षांना मुखर करतो. तर आपल्या परंपरागत धारणा अजूनही चालून जातील, असे भावी पत्नीला ग्रुहित धरणारा शहरी मध्यमवर्गीय तरुण समजतो !

वास्तवात हे नव्याने उपलब्ध झालेले स्वातंत्र्य व उत्कर्षाच्या संधी आणि त्यातील जीवघेणी स्पर्धा, अनिश्चितता यांचे सुस्पष्ट आकलन झाल्याशिवाय विवाहपूर्व संवाद वास्तवात फलदायी ठरणार नाही.
परिचयोत्तर विवाह केंद्रानेही हे बहुपदरी वास्तव आजच्या तरूणाई समोर ठेवणे गरजेचे आहे.
(समाप्त)

– किशोर मांदळे

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *