भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

भीमराव यशवंत आंबेडकर यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : दीक्षाभूमीवरील वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करा.

 
नागपूर : दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्या संदर्भातील दस्ताऐवज आज नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनामार्फत भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिले आहे. 
 
भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 14/10/1956 रोजी लाखो अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा दिली, त्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे. बौद्ध समाजामध्ये दीक्षाभूमीला अनन्यसाधारण महत्व असून, दीक्षाभूमी हे जागतिक कीर्तीचे ठिकाण आहे. सदर दीक्षाभूमी ‘ अ ‘ दर्जाचे स्मारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
 
सदर दीक्षाभूमीवर, दीक्षाभूमी स्मारक समितीने भूमिगत वाहनतळ बांधकामासाठी अनधिकृतपणे संमती दिल्याचे निदर्शनास आलेले आहे. बौद्ध व आंबेडकरी जनतेमध्ये याबाबत तीव्र असंतोष आंबेडकरी समाज बांधव, विविध संघटनांच्या वतीने दीक्षाभूमी येथे अंडरग्राउंड पार्किंगच्या कामाला विरोध करण्यासाठी दीक्षाभूमी बचाव आंदोलनही केले आहे. तसेच दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बहुसंख्य सदस्यांनी विरोध केलेला आहे. असेही या निवेदनात म्हटले आहे.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो अनुयायी येत असतात. वरील पार्श्वभूमीवर या वर्षीच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनास प्रचंड जनसमुदायास उपस्थित राहणार आहेत. आता नुकतीच हाथरस ( उत्तर प्रदेश) येथील चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये १२१ लोकांना मृत्यूस सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे येणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी हाथरस सारख्या अप्रिय घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासन जबाबदार राहील हे देखील निवेदनात नमूद केले आहे. तरी या बाबी लक्षात घेऊन दीक्षाभूमीवरील भूमीगत वाहनतळ बांधकाम ताबडतोब रद्द करून जमीन पूर्ववत करून द्यावी अशी विनंती यामध्ये करण्यात आली आहे.
 
 
 
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *