• 25
  • 1 minute read

महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

महोत्सव कवितांचा आणि सन्मान सोहळ्यात प्रवीण बागडे यांचा गौरव

 कविता म्हणजे समाजाचे आरसेपण जपणारी सर्जनशील अभिव्यक्ती. याच विचारातून कविता म्हणजे प्रबोधन, संगमनेर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महोत्सव कवितांचा’ आणि सन्मान सोहळ्यात नागपूर येथील साहित्यिक-कवी प्रवीण बागडे तसेच प्रभाकर सोमकुवर यांचा गौरव करण्यात येणार आहे. हा साहित्यिक आणि सांस्कृतिक सोहळा रविवार, १ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री कचेश्वर देवस्थान मंदिर, बोटा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी संगमनेर, राहुरी, पारनेर, जुन्नर, नागपूर आणि अकोला या विविध तालुक्यांमधून निवडक साहित्यिक, कवी, विचारवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
        संमेलनाचे प्रमुख पाहुणे आधुनिक गाडगेबाबा डॉ. हरिभाऊ उगले राहणार असून स्वागताध्यक्ष म्हणून कृषी उपसंचालक श्री प्रविण गवांदे यांची उपस्थिती लाभणार आहे. काव्यसंमेलनात प्रवीण बागडे हे सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या आशयपूर्ण आणि संवेदनशील कवितांचे सादरीकरण करणार आहेत. सामाजिक प्रश्नांवरील परखड मांडणी, प्रखर शब्दशैली आणि परिवर्तनवादी दृष्टिकोन यामुळे प्रवीण बागडे यांच्या कविता वाचक-श्रोत्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या सहभागामुळे ‘महोत्सव कवितांचा’ या साहित्यिक सोहळ्याची उंची अधिक वाढली असून साहित्यप्रेमी आणि रसिकांकडून त्यांच्या निवडीचे स्वागत व कौतुक होत आहे. या महोत्सवातून कवितेच्या माध्यमातून सामाजिक जाणीव जागृत करण्याचा आणि नव्या प्रतिभांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयोजक गौतम वाघमारे यांनी सांगितले आहे.
 

प्रवीण बागडे

0Shares

Related post

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स

इंग्रजांच्या विरोधात लढून मृत्यू पत्करलेला टीपू सुलतान एकमेव प्रिन्स ! टिपू सुलतान यांच्या बद्दलचे अभ्यासुन व्यक्त…
आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *