• 672
  • 1 minute read

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एम. टेक., पीएचडी. तृतीयपंथी उमेदवार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एम. टेक., पीएचडी. तृतीयपंथी उमेदवार

हिंगोली लोकसभा  मतदारसंघातून एका उच्चशिक्षित तृतीयपंथीय उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघाच्या अद्याप न सुटलेल्या समस्यांसाठी आपल्याला संसदेत पाठवा असं आवाहन विश्वनाथ फाळेगावकर  या तृतीयपंथीय उमेदवाराने केलं. 

हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून सोमवारी उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर उमेदवारांना चिन्ह वाटप केलं जाईल. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा खासदार होण्यासाठी एका उच्चशिक्षित तृतीयपंथी उमेदवारने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झाल्यानंतर यामध्येच संशोधनाचं काम करणाऱ्या विश्वनाथ फाळेगावकर या तृतीयपंथी उमेदवाराला हिंगोली लोकसभेचा खासदार व्हायचंय.

हिंगोलीत शिक्षण आणि आरोग्याची सुविधा काहीच नाही, ती सुधारावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संसदेत बोलताना तुम्हाला मराठी, हिंदीसोबत इंग्रजीही आली पाहिजे. आपल्या लोकप्रतिनिधींना साधं बोलता येत नाही, त्यांना मुद्दे मांडता येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. खासदारांच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले.  

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *