• 160
  • 1 minute read

स्वातंत्र्य आंदोलन व शहीद परिवाराचे वारसदार मुख्तार अन्सारी यांना भावपुर्ण आंदरांजली…!

स्वातंत्र्य आंदोलन व शहीद परिवाराचे वारसदार मुख्तार अन्सारी यांना भावपुर्ण आंदरांजली…!

उत्तर प्रदेशात मृत्यू अन् हत्या यामध्ये आता कुठलाच फरक राहिलेला नाही. अन् या हत्या अगदी सहजपणे केल्या जात आहेत. अतिक अहमद अन् आता मुख्तार अन्सारी यांची हत्या सरकारने नियोजनबध्द पद्धतीने केली. अतिक अहमदची हत्या पोलिस बंदोबस्तात अन् न्यायालयाच्या आवारात केली. तर तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना खाण्यातून विष दिले गेल्याचा आरोप त्यांनी स्वतःच केला आहे. अतिक अहमदच्या मारेकऱ्यांना तर अटक केली आहे. मात्र हत्येमागील मास्टर माईंड सरकारी संक्षणात मोकाट फिरत आहेत. मुख्तार अन्सारी आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांची ही हत्याच आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे काम न्याय व्यवस्थेचे आहे. पण भाजप सरकारने ते आपल्याच हातात घेतले आहे, हे स्पष्टपणे उत्तर प्रदेशात होत असलेल्या हत्यांवरून वाटते. बाकी स्वातंत्र्य आंदोलनाचा वारसदार असलेल्या मुख्तार अन्सारी यांना भावपूर्ण आदरांजली.
अतिक अहमद व मुख्तार अन्सारी ही नावे गुन्हेगारी जगतातीलच प्रभावशाली नावे होती, असे नाही. राजकरणात ही ती प्रभावशाली होती. आपापल्या क्षेत्रातील सर्व जाती, धर्मांच्या लोकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना ज्या ज्या वेळी मिळाली, त्या त्या वेळी त्यांनी धर्मनिरपेक्ष व्यवहार केला. लोक प्रतिनिधी म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामांना तोड नाही. गरजू मग तो कुठल्या जातीचा अथवा धर्माचा असो अतिक अहमद व मुख्तार अन्सारी यांच्या दरबारातून, फाटक व दरवाज्यातून मोकळ्या हाताने कधीच जात नव्हता याची कैक उदाहरणे आहेत. बहुजनवादी राजकारण या दोघांनी ही केले.
मुख्तार अन्सारी यांचे दादाजी डॉ. अहमद अन्सारी हे स्वातंत्र्य आंदोलनातील एक प्रभावशाली नाव व स्वातंत्र्य सैनिक होतें. महात्मा गांधी यांच्या सोबत त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. तर त्यांचे नाना ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान हे भारत पाकिस्तान युध्दात भारताकडून लढत असताना शहीद झाले आहेत.

-राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *