• 65
  • 1 minute read

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

१६ व्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना…

हुजरेगिरी करणाऱ्यांना प्रतिभावंत म्हणता येणार नाही !


– डॉ. प्रकाश मोगले

भाषणातील महत्त्वाचे मु‌द्दे :

* संमेलनाच्या आयोजकांनी स्पष्टपणे ‘आंबेडकरी साहित्य संमेलन’ असा शब्दप्रयोग केला आहे.
* 45 वर्षे बहिष्कृत समाजाच्या उद्धारासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचले. मूकसमाज आपल्या व्यथा बोलू लागला. यातून नव्या संस्कृतीचा नव्या साहित्याचा उदय झाला. त्याची प्रेरणा बाबासाहेबांचे विचार व कार्य होते. त्यामुळे या प्रवाहाला आंबेडकरी साहित्य म्हणणे आधिक सार्थ होईल.
* समाज, माणसे दलित असू शकतात. पण साहित्य कधीही दलित असू शकत नाही. पाणतावणे, ढसाळ, लिंबाळे आदी साहित्यिकांनी दलित साहित्य शब्दाचा आग्रह धरला. तो चुकीचा आहे.
* साहित्य व संस्कृती यांचा घनिष्ठ संबंध असतो. भारतातही दोन संस्कृती नांदत आहेत. एक ऐतखाऊंची आणि दुसरी श्रमिकांची. या दोन संस्कृतीत संघर्ष आहे. या संघर्षाच्या इतिहासाला बाबासाहेब, क्रांती व प्रतिक्रांतीचा इतिहास असे संबोधतात.
* समतावादी संविधान व विषमता आधारित धर्मग्रंथ एकत्र जाऊ शकत नाहीत. समता प्रगतीचा तर विषमता राष्ट्रविघातक मार्ग असल्याने आपण कुणासाठी लिहितो व जे लिहितो ती सांस्कृतिक कृती आहे, या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.
* प्रतिभावंतांना अवलोकन, आकलन आणि अभिव्यक्ती या तीन गोष्टींसाठी मेहनत घ्यावयाची आहे. जीवनानुभवासोबत जगातील उत्तमोत्तम साहित्याचे वाचन लेखकांनी केले पाहिजे.
* कवी, कलावंत यांनी राजकारण केले पाहिजे. सक्रिय राजकारणात नसलात तरी राजकारण समजून घेतले पाहिजे. राजकीय विचारधारा व संघटनांवर प्रतिभावंतांनी पाळत ठेवली पाहिजे.
* आपल्या समतावादी राजकारणाविरोधात काम करणाऱ्या पक्ष व संघटनांविरोधात लेखक, कवींनी आघाडी उघडली पाहिजे.
* लेखण्या मोडा तलवारी हाती घ्या ! हा विचार विधायक नाही. नवनिर्मितीचा नाही.
* देश नागविणाऱ्या ‘राजा’पुढे हुजरेगिरी करणारे प्रतिभावंत कसे असू शकतात ?
* अशा नाठाळांच्या माती काठी हाणायचे सोडून लाचार साहित्यिक दिल्लीला गेले. तिथे अहंकारी राजाने संमेलनाअध्यक्षांनाच कोपऱ्यात उभे केले. लोचट अध्यक्ष गुमान उभ्या राहिल्या !
* याच अहंकारी राजाच्या सेन्सॉर बोर्डाने ‘मी नथुराम गोडसे बोलतोय !’ या नाटकाला परवानगी दिली. पण नामदेव ढसाळांवरील सिनेमाला परवानगी नाकारली.
* फुले आंबेडकरचे नाव घेणारे पण सांस्कृतिकदृष्ट्या मरेपर्यंत हिंदूच राहणारे कधी सार्वजनिक सत्यधर्म व बुद्ध धम्माकडे वळत नाहीत. यांचे पुरोगामीत्व नीट तपासून घेतले पाहिजे.
* हिंदूंच्या दहा अवतारात बुद्ध असेल तर हिंदूंच्या देवघरात बुद्ध का नाही ? हा तारा भावाळकरांचा प्रश्न अवतार न मानणाऱ्या बुद्धालाच देवघरात बसविणारा आहे.
* गावागावात, भावाभावात, हिंदू मुस्लिमात वैरभाव शासकीय पातळीवरून निर्माण केला जात आहे. प्रेमभावना, शांतता व सलोखा यासाठी आपण लेखण्या झिजवूया.
* समारोप त्यांनी साहिर लुधियानवींच्या काव्यपंक्तींनी केला
ख़ून अपना हो या पराया हो
नस्ल-ए-आदम का ख़ून है आख़िर
जंग मशरिक़ में हो कि मग़रिब में
अम्न-ए-आलम का ख़ून है आख़िर

संकलन : किशोर मांदळे

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *