• 80
  • 1 minute read

PSI वयवाढ : महाराष्ट्र काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा!

PSI वयवाढ : महाराष्ट्र काँग्रेसचा महायुती सरकारला थेट व अंतिम इशारा!

मुंबई | दि. २९ डिसेंबर २०२५
 
PSI (पोलीस उपनिरीक्षक) पदासाठी वयोमर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी हजारो उमेदवार गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र महायुती सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे, दिरंगाईमुळे आणि निर्णयक्षमता अभावामुळे आजही या अत्यंत संवेदनशील व न्याय्य मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी हजारो पात्र, मेहनती आणि प्रशिक्षित तरुण वयोमर्यादेबाहेर फेकले गेले असून त्यांच्या भविष्याशी थेट खेळ केला जात आहे. हा केवळ अन्याय नसून लाखो युवकांची उघड फसवणूक आहे.
 
PSI परीक्षेसाठी उमेदवारांनी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, आर्थिक गुंतवणूक, शारीरिक तयारी आणि मानसिक तयारी केली आहे. PSI जाहिरात सरकारकडून तब्बल अनेक महिने उशिरा प्रसिद्ध झाली—हा दोष पूर्णपणे सरकारचा आहे. मात्र या प्रशासकीय अपयशाची शिक्षा परीक्षार्थींना दिली जात असून अवाजवी वयोमर्यादेमुळे पात्र उमेदवारांना संधी नाकारली जात आहे. हा घोर अन्याय तात्काळ थांबवला गेला पाहिजे.
 
महाराष्ट्र काँग्रेस पक्षाची स्पष्ट आणि ठाम मागणी आहे की PSI पदासाठी *तात्काळ १ वर्ष वयोवाढीचा GR जाहीर करावा* आणि वयोमर्यादेची गणना *०१ जानेवारी २०२५* प्रमाणे करण्यात यावी. आत्तापर्यंत सर्वच पक्षांच्या ९० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींनी 
 या मागणीसाठी सरकारकडे लेखी पत्रे सादर केली आहेत, तरीही सरकारने निर्णय घेतलेला नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.
 
जर सरकारने तात्काळ निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने *पुणे शहरात तीव्र, व्यापक आणि रस्त्यावर उतरून आंदोलन* छेडले जाईल. या आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी महायुती सरकारची असेल.
 
तरुणांचा संयम आता संपत चालला आहे. वेळेत निर्णय न घेतल्यास सरकारला याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणाम भोगावे लागतील.
 
 
 
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *