• 980
  • 1 minute read

आणि…वाळवंटात झाले पाणीच पाणी !

आणि…वाळवंटात झाले पाणीच पाणी !

दुबई विमानतळावर काल अवघ्या बारा तासात सुमारे १०० मिमी पावसाची नोंद झाली. २४ तासात एकूण १६० मिमी पाऊस पडला. एकाच दिवसात अधिक प्रमाणात पाऊस पडल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे आलेल्या पुराचा दुबईच्या वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळ पाण्याने भरले आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सल्लागार जारी केला होता ज्यात लोकांना खराब हवामानाबद्दल सतर्क केले होते.
संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये काल वर्षभराचा पाऊस एकदाच आल्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे अनेक शहरे ठप्प झाली आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्याखाली गेले आहे. इथल्या रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. इतकेच नाही तर शेजारील ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे

0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *