• 4
  • 1 minute read

काँग्रेसनं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरोधात उमेदवार का दिला ?

काँग्रेसनं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविरोधात उमेदवार का दिला ?

तर देशाच्या या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून, म्हणजे तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातून, निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांचा मतदारसंघ होता उत्तर मुंबई.
निवडणूक झाली, आणि निकाल संबंध देशाला धक्का देणारा ठरला. कारण नारायणराव काजरोळकरांना 1 लाख 38 हजार 137 मतं, तर बाबासाहेब आंबेडकरांना 1 लाख 23 हजार 576 मतं मिळलाी. काँग्रेसच्या काजरोळकरांनी आंबेडकरांचा पराभव केला. तोही तब्बल 14 हजार 561 मतांनी.

बाबासाहेबांना काँग्रेसनं ठरवून पराभूत केलं, हा आरोप तेव्हापासून आजवर कायम होत आलाय.

काँग्रेसनं बाबासाहेबांचा खरंच ठरवून पराभव केला होता का, हे जाणून घेण्यासाठी आपण त्यावेळच्या काही घडामोडी समजून घ्यायला हव्यात.

स. का. पाटील हे मुंबई काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. बॉम्बे काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत येणाऱ्या मतदारसंघात त्यांच्याशिवाय कुणाचा शब्द चालत नसे. बॉम्बे काँग्रेसवर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं. मुंबईतील उमेदवार ते ठरवत किंवा दिल्लीतून उमेदवार ठरवला गेला तरी स. का. पाटलांच्या होकाराशिवाय त्यावर अंतिम निर्णय होत नसे.

मुंबईत आपला दबदबा राखून असलेल्या स. का. पाटलांनी खरंतर निवडणुकीआधीच्या काही महिने आधीच जाहीर म्हटलं होतं की, “आंबेडकर राखीव जागेवरून उभे राहिल्यास त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार देणार नाही.”*
मग काँग्रेसनं नारायणराव काजरोळकरांच्या रुपात उमेदवार का दिला? असा सहाजिक प्रश्न निर्माण होतो.

तर आचार्य अत्रेंनी स. का. पाटलांवर केलेल्या एका टीकेतूनच त्याचं उत्तर मिळतं.

अत्रे ‘कऱ्हेचे पाणी’मध्ये लिहितात की, “बाबासाहेब जर मुंबईतील राखीव जागा लढवणार असतील तर काँग्रेस त्यांना विरोध करणार नाही, असे सदोबांनी (स. का. पाटील) पूर्वी जाहीर केले होते. पण शेकाफे आणि समाजवादी पक्ष यांचा करार होताच सदोबांचे डोके भडकले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे नारायणराव काजरोळकर यांचे नाव जाहीर केले.”

आणि आजही काँग्रेस बाळासाहेब आंबेडकर विरोधात अकोल्यात उमेदवार देऊन आंबेडकर ह्यांना विरोध करत असते आणि बाळासाहेब ह्यांना ठरऊन हरविते पण आपले बुद्धिजीवीना हे समजणार नाही

0Shares

Related post

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत…

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट…
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *