• 190
  • 1 minute read

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकासाठी सर्वच विभागाचा निधी वापरला जावा – अबू असीम आजमी यांची मागणी

चैत्यभूमी जवळील इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होत असून, येथे उभारण्यात येणाऱ्या ४५० फूट उंचीच्या डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यामध्ये गंभीर दोष आहेत. स्मारकाच्या कार्यात जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. या स्मारकासाठी येणाऱ्या खर्चाचे व कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी एमएमआरडीए ची असली, तरी, यासाठी लागणारा सर्व निधी सामाजिक न्याय विभागाचा वापरला जात आहे. यामुळे, दलित विकासाच्या अन् कल्याणाच्या अनेक योजनांना चाप बसला आहे. स्मारकाच्या आडून दलित समाजाच्या विकास कार्याचा निधीच आता सरकार पळवून नेत आहे. इंदू मिल येथे होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, हे सर्व भारतीय नागरिकांचे आहे. त्यामुळे सर्वच विभागाचा निधी या स्मारकसाठी वापरला जावा, आदी संदर्भात शिवसेना नेते व माजी आमदार बाबुराव माने यांनी नुकतीच समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांची भेट घेतली. यावेळी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव राहुल गायकवाड, मुंबई प्रदेश सचिव रहीम मोटारवाला अन अशफाक भाई उपस्थित होते.
      यावेळी महाड स्थित चांभारगडला चर्मकार समाजाच्या शौर्याचे प्रतिक, तसेच पर्यटन व तीर्थक्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी आमदार अबू असीम आजमी यांनी नुकतीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. याबद्दल बाबुराव माने यांनी आजमी यांचे अभिनंदन केले व या आंदोलनात सर्व प्रकारचे सहकार्य करणाचे आश्वासन ही दिले.
    डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यात जे दोष आहेत, ते दूर करून दोष मुक्त पुतळा निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीची स्थापना ही नुकतीच करण्यात आली असून, या समितीचे सदस्य ही लवकरच आजमी यांना भेटणार आहेत….
 
 
 
0Shares

Related post

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…
शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

शेल्स देशाचा नागरी सन्मान सहा ॲम्ब्युलेन्सच्या बदल्यात मिळाला , तर इंडोनेशियाचा पुरस्कार कशाच्या बदल्यात मिळाला …..?

ढासळत चाललेल्या प्रतिमेच्या डागडुजीसाठी विदेशी पुरस्कार मिळविण्याचा सपाटा सुरू…..!          देश गंभीर संकटात…
काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय ….!

काँग्रेसने केलेला विकास अतिवृष्टीत साक्ष देत उभा, तर भाजपने केलेला विकास कोसळतोय , खड्ड्यांमध्ये दम तोडतोय…

देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्याने महाराष्ट्र एका प्रभावशाली कथा वाचकाला मुकला…..!            …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *