• 123
  • 1 minute read

सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात.

सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात.
         एक लक्षात घेतले पाहिजे आनंदराज आंबेडकर साहेब हे राजकारणात आहेत त्यांचा पक्ष हा राजकीय पटलावर आहे त्यामुळे हे राजकारण आहे आणि राजकारणात जिवंत राहण्यासाठी अथवा राजकीय विचार पुढे नेण्यासाठी युती/आघाडी करावी लागते*.
 
इथे आनंदराज साहेबांची भूमिका अस्पष्ट आहे पण प्रॅक्टिकल आहे. वंचितने उबाठा गटाबरोबर यूती केली महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पण इतर पक्षांनी त्यांना सोबत घेतलं नाही हे पक्ष म्हणून त्याचं मत होते आणि समाजाने सुद्धा ते समजून घेतलं त्यात उबाठा गटाची ताकत मोठी आहे म्हणून लोकांना ते चालले, आता तसेच रिपब्लिकन सेनेसोबत का होताना दिसत नाही कारण रिपब्लिकन सेनची ताकत किती हा चर्चेचा विषय आहे पण बौद्धजन पंचायत समिती ची ताकत मुंबईत आहे आणि रिपब्लिकन सेनेसाठी पूरक आहे पण त्यात गट प्रतिनिधी हे अनेक पक्षाशी संलग्न आहे.
 
कार्यकर्ता जगाला पाहिजे हे त्यांचे मत थोड विसंगत आहे पण सत्तेत सामील होण हा रिपब्लिकन सेनेचा निर्णय फक्त महापालिके पर्यंत मर्यादित आहे की महाराष्ट्रच्या सत्तेत खरोखर घेऊन जाणार हे सर्वस्वी शिवसेनेवर अवलंबून असेल. महापालिकेच्या निवडणुकीत बौद्ध समाजाचा टक्का मुंबईत 10-12%च्या जवळपास आहे आणि ह्या मतांचा वापर शिवसेना करून घेण्याचा विचार नक्कीच करेल, पण त्यांना हे कोण सांगेल की त्या मतांमध्ये RPI चे अनेक गट, वंचित ची मते, रिपब्लिकन सेनेची मते तसेच इतर पक्षात सामील झालेले स्थानिक नेते त्यामुळे ह्या मतांचा उपयोग किती होईल सांगता येत नाही.
 
सर्व मार्ग हे सत्तेत जातात किंवा सत्तेच्या दिशेने घेऊन जावे लागतात, कांशीराम साहेबांनी उत्तरप्रदेश मध्ये जे केले ते पाहता आनंदराज आंबेडकर साहेबांची भूमिका कदाचित बरोबर असेल असे वाटते पण त्यावेळी कांशीरामंच वादळ ह्यांनी अनेक आमदार निवडून आले आणि सत्तेत बसण्यासारखे वातावरण निर्माण झाले असो सध्या *समाजभावना लक्षात घेता अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील पण ह्यातून समाजाचे तसेच आंबेडकरी चळवळीचे चांगले हित होत असेल तर आनंदराज साहेबांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. 
 
आपला केतन कदम
संस्थापक सरचिटणीस महाराष्ट्र श्रमिक सभा (यूनियन)
 
 
 
 
 
0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *