• 122
  • 1 minute read

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

संयम ( मनुस्मृती जाळण्याच्या अतिरेकी ओघात बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्याने उद्भवलेल्या सध्यःस्थितीवर बौध्दांसाठी खास )

भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या,
चतुर तुझा वैरी रे,
डाव त्याचे जाण गड्या…

वैरी तुझा आग लावी,
त्यात तुला झोकी गड्या,
सवे तुझ्या रडे तो ही,
खरे खोटे जाण गड्या,
रात्रच नाही, दिवसही,
वैऱ्याचा आहे गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तू ठेव गड्या…

बरी नाही उग्र भावना,
घाल तया आवर गड्या,
हाणून पाड दुष्ट डाव,
फसू नको त्यात गड्या,
नको कलह अंतरी,
शुध्द तर्क लाव गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या….

येती जाती वादळे जीवनी,
क्षणिकचे सारे गड्या,
गैर ओंजळ कुचकामी,
भले नाही त्यात गड्या,
भीम-बुध्दाचा वारस तु,
ताठ उभा रहा गड्या,
भडकू नको, अडकू नको,
संयम तु ठेव गड्या…

कवीः प्रकाश डबरासे
(३० मे २०२४)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *