• 176
  • 1 minute read

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला
बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श …
दिवस बसून राहात नाहीत. बदलतात !

भाकरीवरच्या ‘भीमसही’ची गोष्ट …

गावाकडच्या दुष्काळाला आणि गाववाल्या सरंजामदारांच्या माणुसकीला कंटाळून पोट भरायासाठी रेल्वेने बिनातिकीट दिसेल त्या सायबाच्या हातापाया पडत पुण्यात आलेली आणि मंगळवारपेठ, आरटीओ इकडे झोपड्या टाकून हाताला मिळेल ते काम करणारी दहा पंधरा कुटुंबे लवकरच अतिक्रमण ठरली.

आणि एका सकाळी शासकीय टेम्पो ट्रकने झोपड्या उचकटून चुलीवर शिजत असलेल्या चहासकट, वांगीबटाटा भाजीच्या कालवणासकट , पीठ मळलेल्या काटवट सकट, झोपडीची पोती, काठ्या, चराट दावी आणि त्यांच्या संसारातली दोन दोन जर्मलची भांडी यांची उचलबांगडी करून लक्ष्मीनगरच्या खाणीत ती पंधरा कुटुंबे आणून टाकली.
गावाला कंटाळून आलेल्या, भुकेकंगाल दरिद्री माणसांचे शहरातल्या व्यवस्थेने केलेले हे पहिले ‘वेलकम.’

आंबेडकर जयंतीला रात्रभर जागत निळ्या पताका दोरीला चिकटवताना बोटाला लागलेल्या खळीचा वास. बौद्ध पौर्णिमेला बुद्धासाठी सुजाताने केलेल्या म्हणून आमच्या माय मावश्यांनी केलेल्या तांदळाच्या खिरीचा वास !
आयुष्यातले अनोळखी गोड बाबासाहेबांमूळे माहीत पडले. लहानपणी पाहिलेल्या, अनुभवलेल्या वस्तीतल्या जयंतीतून , गायनपार्टीच्या गाण्यातून बाबासाहेब आमच्यात हळूहळू झिरपत गेले. पुन्हा आयुष्यात पुस्तके आली आणि बाबासाहेब खोलवर रूजले.
मी पाहिलेली जयंती माझी मुले पाहू शकत नाहीत पण ते मी उठायच्या आत हार फुले घेऊन आलेली असतात. बाबासाहेबांना कृतज्ञतेने अभिवादन करतात.
…. त्यांना माहीत आहे, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे !

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *