• 200
  • 1 minute read

अरे माणसा…

अरे माणसा…

अरे माणसा,
होशील कधी माणूस,
मी पणाच्या नादात,
करशील किती नासधूस…

जन्मला तेव्हा,
होता अगदी निरागस,
दिसे का तो चेहरा,
इतका कासावीस….

चकाके ते सारेच,
सोने नसते रे,
मृगजळ मोहात,
उगीच पडू नको रे…

दिसती जे आज,
ते उद्या नसणार,
काही ना शाश्वत,
सत्य हेच चौफेर…

भूक का भागेना,
पोट तर चिमुटभर,
नको रे ओरबडने,
देह गड्या नश्वर…

गेलीना वेळ,
जाण माणूसपण,
जन्म एकदाचा,
सोड अमाणूसपण…

– प्रकाश डबरासे

0Shares

Related post

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”  – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा” – ॲड. प्रकाश आंबेडकर

नीट (NEET) रद्द करा आणि शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा”* – ॲड. प्रकाश आंबेडकर        …
एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद

  एका महिन्यात तिसरी आवृत्ती; अनिल वैद्य यांच्या ग्रंथाला उत्स्फूर्त प्रतिसाद* नाशिक, प्रतिनिधी :     …
संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल

संत कबीराचा एक तरी दोहा अनुभवावा-प्राचार्य डॉ अजित कुमार जयस्वाल साक्री -मानवी जीवनात संत कबीराचा एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *