वास्तव जगणे

वास्तव जगणे

हे कसे दिवस
पिसाळलेल्या कुत्र्यासारखे
मनातल्या सौजन्यावर येतात
पुन्हा पुन्हा धावून
अन् आपण सभ्यपणाची 
झूल पांघरलेले कमजोर जीव
धड प्रतिकारही करू शकत नाही
 
आपणास खूप वाटते
हे जग बदलावे चुटकीसरशी
अन् सुखाच्या नद्या वाहाव्यात
आपल्या आकांक्षाच्या अंगणातून
परंतु असे कधी होतच नाही
उगवणारा प्रत्येक दिवस घेऊन येतो
उत्तरे नसलेल्या चिवट प्रश्नपत्रिका
आयुष्याची घोकंपट्टी जगणारे आपण
मग शोधतो बसतो उत्तरं केविलवाणे… 
 
हे दिवसं असेच सरकत राहतात
आपल्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्यांपुढून
आपण खूप धडपड करत असतो
एखादे तथ्याचे तारांगण पकडण्यासाठी
परंतु नेहमीच आपल्या हाती येत असतो
मिळमिळीत मिथकांचा मृत मोहेंजोदडो
 
हे दिवस कधी गुढ होत जातात
श्रावणातल्या सावल्यासारखे
अन् स्वप्न मृगजळ होऊन छळतात
पापण्यातील पावित्र्याला निरंतर
 
आता हे दिवस कधी बदलणार
याचा विचार करत न बसता 
आपण चालत राहिले पाहिजे
आपल्याला हव्या असलेल्या दिशेने
मला वाटते यालाचा म्हणता येईल
वास्तव जीवन जगणे. 
 
प्रा माधव सरकुंडे
0Shares

Related post

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

फडणवीस – शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! –

देवाभाऊ फडणवीस व शिंदे यांच्याकडून फसविल्या गेलेल्या लाडक्या बहिणींच्या नावे खुले पत्र…..! प्रिय लाडक्या बहिणीनो,   …
सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!      …
पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *