• 43
  • 1 minute read

संविधान व आंबेडकरी विचारांशी द्रोह करणाऱ्या विरुध्द उभे राहणाऱ्या सर्वाचे स्वागत…!

संविधान व आंबेडकरी विचारांशी द्रोह करणाऱ्या विरुध्द उभे राहणाऱ्या सर्वाचे स्वागत…!

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी हा वंचित समाज व बहुजनांचा पक्ष नाही. लोकशाही व संविधान वाचविण्याची वेळ आली असताना वंचित बहुजन आघाडी भाजपला फायदा मिळवून देण्यासाठी, पुरोगामी विचारांचा मतांमध्ये विभाजन करण्यासाठी त्यांनी निवडणूक रिंगणात आहे. हा संविधान, लोकशाही अन आंबेडकर विचारांशी द्रोह आहे, हे स्पष्टपणे समोर आल्यानंतर वंचितचे जे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात उभे राहून संविधान वाचविण्याच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत, त्या सर्वांचे जाहीर अभिनंदन. फडणवीसांच्या सागर बंगल्यावरुन दिलेले उमेदवार मागे घेण्याची नामुष्की प्रकाश आंबेडकर यांच्यावर या अगोदरच आली आहे. आता सोलापूर मतदारसंघातील वंचितचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने आणखी बेज्जती झाली आहे. अन् हे इथेच थांबणार नाही, अशा बेज्जतीला यापुढे अनेक वेळा समोरे जावे लागणार आहे.
परम आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्याबाबतीत प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचितने सुरुवातीला काय भूमिका घेतली होती ? त्यावर आनंदराज आंबेडकर यांची काय प्रतिक्रिया होती ? त्यानंतर दोघांनीही नमते घेऊन आपल्या भूमिका का बदलल्या, हा तमाशा साऱ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे सरवासरव करण्याची अजिबात गरज नाही.
अमरावतीचे जिल्हा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रा. शैलेश गवई अन त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय संविधान व लोकशाही वाचविणारा असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयाचे स्वागत. आपला निर्णय हा ऐतिहासिक असून आंबेडकरी विचारांच्या लढाईत तो तितकाच ऐतिहासिक व अभिमानस्पद आहे. संविधान वाचणार की संपणार हे ठरविणारी ही निवडणूक आहे. मटपेटीतून काय काय निर्णय येणार हे आज आज सांगता येणार नाही. पण संविधानवादी म्हणजे आंबेडकरवादी कोण ? व आंबेडकरद्रोही कोण ? हा निर्णय नक्कीच या मतपेटीतून बाहेर पडेल.

– राहुल गायकवाड,
(महासचिव, समाजवादी पार्टी,महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

📽️🎞️ प्रगतशील कोंकण सामाजिक संस्था आयोजित कोकण शॉर्ट फिल्म स्पर्धा २०२४📹🎥

📽️🎞️ प्रगतशील कोंकण सामाजिक संस्था आयोजित कोकण शॉर्ट फिल्म स्पर्धा २०२४📹🎥

प्रगतशील कोंकण सामाजिक संस्था घेऊन येत आहे, “ माझे कोकण माझा जिल्हा” या विषयावर आधारीत शॉर्ट…
लोकशाहीतील आपली जबाबदारी !

लोकशाहीतील आपली जबाबदारी !

लोकशाहीचे मूलभूत तत्त्व म्हणजे धर्म, प्रदेश, जात, वर्ग, समुदाय आणि लिंग यांचा विचार न करता समानता.…
देशाला मागास करणारा निर्णय

देशाला मागास करणारा निर्णय

भारत 1947 साली स्वतंत्र झाला. त्याआधी भारतीय समाजात मनुस्मृतीचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात होते आणि त्यात विदित…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *