केंद्र शासनाच्या नविन कायद्यांच्या विरोधात धुळे जिल्हा वकिल संघाचा एकमताने ठराव. नविन कायद्यांची अमंल बजावणी त्वरीत थांबविण्यासाठी ठराव

केंद्र शासनाच्या नविन कायद्यांच्या विरोधात धुळे जिल्हा वकिल संघाचा एकमताने ठराव. नविन कायद्यांची अमंल बजावणी त्वरीत थांबविण्यासाठी ठराव

ठराव बार कौन्सिल ॲाफ इंडिया व बार कौन्सिल ॲाफ महाराष्ट्रा कडे पाठविला* 

 
धुळे दि.२९(यूबीजी विमर्श)
                केंद्र शासनाने दि. १ जुलै २०२४ रोजी भारतीय न्याय संहिता, २०२३,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ आणि भारतीय साक्ष अधिनियम, २०२३ हे कायदे अंमलात आणत आहे. सदर कायदे हे न्यायव्यवस्थेत अमंल बजवणीस बहुतांशी अपात्र आहेत. केवळ कायद्याच्या नावात व कायद्यातील कलमांचे क्रमांकात बदल केल्याने मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. अधिक्तम कायदे जसे च्या तसे ठेवून केवळ दुरूस्ती करण्या सारखे नगन्य कलम साध्या दुरूस्तीनेही बदलता आले असते. परंतु आहे तो कायदा जास्त बदल न करता केवळ नावात बदल करून जणू काही नविन कायदा आणला असा कांगवा निर्माण केला जात आहे. सदर कायदे पारीत होत असतांना बार कॅान्सिल व वकिलांना नविन बदलांने होणाऱ्या अडचणींचा विचारात करण्यात आलेला नाही. धुळे जिल्हा वकील संघाच्या दि.२९/६/२०२४ तातडीच्या बैठकीत धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व बैठकीचे अध्यक्ष ऍड.राहुल पाटील व सर्वानुमते नविन कायद्यां मधील आनावश्यक व काही चुकीचे बदलाच्या विरोधात ठराव करण्यात आला. ठरावाची प्रत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तसेच बार कौन्सिल ऑफ इंडिया कडे पाठवण्यात येणार आहे.
        यावेळी धुळे जिल्हा वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ,वकील सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.
0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *