• 92
  • 1 minute read

पब्लिक इश्यूंचा पूर आला आहे. अजून येणार आहे..

पब्लिक इश्यूंचा पूर आला आहे. अजून येणार आहे..

आजकाल कोणतेही इकॉनॉमिक डेली उघडून बघा. इकॉनोमिक टाइम्स, बिझनेस स्टॅंडर्ड, बिझनेस लाईन. बातम्यांचे पहिले पान येण्याच्या आधी दोन, तीन, कधीतरी चार पब्लिक इशूच्या प्रत्येकी दोन पानपान भर जाहिराती असतात.

          २०२२ मध्ये ४० पब्लिक इश्यू मधून ४०,००० कोटी रुपये भांडवलाची उभारणी झाली.
२०२३ मध्ये ७८ इश्यू मधून ६८,००० कोटी रुपये
२०२४ मध्ये ८२ इश्युमधून १,८२,००० कोटी रुपये
२०२५ मध्ये आतापर्यंत ४८ इश्युमधून ६५,००० कोटी रुपये

पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे बरेच आहेत.

शेअर डिमॅट अकाऊंट मध्ये आल्यानंतर, शेअर लिस्टिंग झाल्या झाल्या विकून टाकणारे बरेच आहेत.

पब्लिक इश्यू ही खरेतर दीर्घकालीन गुंतवणूक असली पाहिजे. पण नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांचा काहीही अभ्यास नसतो. लवकरात लवकर जास्तीत जास्त नफा मिळवणे हे एकमेव ध्येय झाले आहे.

त्यात काही गैर नाही. कधीपर्यंत जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष नफा मिळतो तोपर्यंत. आणि तोटा झाला तर ?

किती पब्लिक इश्यू त्यांच्या इश्यू प्राईस पेक्षा जास्त किंवा कमी किमतीत आहेत हा प्रश्न नवीन गुंतवणूकदारांनी विचारला पाहिजे.

२०२४ मध्ये जे पब्लिक इश्यू आले त्यापैकी ४० टक्के कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इशू प्राइस पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत.

काही वेळा तोटा आला, नुकसानं झाले तरी हरकत नाही. पण त्यातून शिका. आंधळेपणे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चूका करू नका.

शेवटचे. कर्जे काढून शेअर्स मध्ये कधीही गुंतवणूक करू नका. ब्रोकर लोक तर जाळे टाकून बसले आहेत.

संजीव चांदोरकर (२५ सप्टेंबर २०२५)

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *