संविधान दिनाच्या निमित्ताने

संविधान दिनाच्या निमित्ताने

आजच्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत जातीय सलोखा आवश्यक!

घटनेच्या ओनाम्यात / प्रीऍम्बल मध्ये त्याचप्रमाणे मार्गदर्शक तत्वांमध्ये (डिरेकटीव्ह प्रिंसिपल्स) आहेत अनेक मूल्यांचा समावेश आहे ; लोककल्याण , आर्थिक विषमता कमी करणे , स्त्री पुरुष समानता , धार्मिक / जातीय सलोखा इत्यादी

घटनेतच मूल्यांचा समावेश केलेला असल्यामुळे ती पाळणे भारतीय नागरिकांवर बंधनकारक असतीलच ; पण हि खूपच शुष्क, कायद्याची भाषा झाली ;

संविधानिक मूल्यांची उपयुक्तता फक्त वंचित राहिलेल्या/ नागरिकांच्या विशिष्ट गटाला नाही तर ती सर्वांना आहे , तुम्हाला देखील आहे. हे असे दाखवून दिले तर फक्त मानवतावादी मूल्यांसाठी नाही तर त्याच्या राजकीय स्वीकारार्हतेचा पाया अधिक व्यापक होऊ शकतो

दोनच उदाहरणे पुरेशी आहेत
______

आर्थिक विषमता कमी करणे

आर्थिक विषमता कमी झाल्यामुळे आर्थिक पिरॅमिडच्या खालच्या पायऱ्यांवर असणाऱ्यांना लाभ होईल ; मग मी मध्यम / उच्च मध्यम / श्रीमंत गटात मोडतो , हे माझ्यावर अतिरिक्त कर बसवणार , मग मी कशाला त्याला पाठिंबा देऊ ?

पण डाव्या नाही मुखप्रवाहातील साहित्य आणि आकडेवारीवरून हे दाखवता येईल कि कमी संख्येने असणाऱ्या वर्गाच्या मिळकती वाढत राहिल्या तर

मिळकतीच्या प्रमाणात या वर्गाचा उपभोग वाढू शकत नाही ,
देशांतर्गत बाजारपेठेच्या पाया संकुचित राहतो
जीडीपी वाढ होत नाही, गुंतवणुकी / एकूणच रोजगारावर परिणाम होतो

दुसऱ्या बाजूला श्रीमंतांकडे गेलेला पैसा सट्टेबाजीकडे वळतो ; त्यांची अतिरिक्त जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढते ; त्यातून शेअर मार्केट / रियल इस्टेट मधील सट्टेबाजी वाढते , वित्तीय अस्थिरता वाढते

आर्थिक विषमता कमी करणे फक्त गरिबांच्या हिताचे नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन हिताचे आहे अशा मांडणीचे अपील अधिक व्यापक असेल

__________

जातीय / धार्मिक सलोखा

अर्थव्यवस्था एक असंख्य / अगणित चाकात चाके असणारे अक्राळविक्राळ यंत्र आहे ; एक चाक दुसऱ्या चाकाच्या दातातून सुटले तर इतर चाकांच्या गती मंदावते / थांबते ; वस्तुमाल सेवेची उपलब्धता / गुणवत्ता / उत्पदकता / उत्पादन खर्च यावर परिणाम होतो

सरार्स आवाहने केली जातात ; एखादी जात / एखादा धर्म / विशिष्ट व्यक्ती / धंदेवाल्यांकडून माल / सेवा घेऊ नका ; यातून स्थानिक अर्थव्यवस्थांवर दूरगामी परिणाम होतो , वस्तुमाल / सेवा / मानवी श्रम / भांडवल / कच्चा माल यांचे गतीचक्र तुटते/ मंदावते

ज्याठिकाणी दंगली / तणावग्रस्त परिस्थिती तयार होते तेथे स्थानिक अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम झाला आणि जेथे जातीय / धार्मिक सलोखा आहे तेथे आर्थिक व्यवहार कसे आहेत या बद्दल सर्वे करून त्याची तुलनात्मक आकडेवारी समोर आणली पाहिजे

आजच्या गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत जातीय / धार्मिक सलोखा कसा सर्वांच्या हिताचा आहे हे दाखवून दिले तर त्याचे अपील अधिक व्यापक असेल
______

एका बाजूला आपली मूल्यात्मक मांडणी सुरूच ठेवतांना , त्यांच्या अंगणात , त्यांच्या बॅट / बॉलने, त्यांच्या परिभाषेत बोलता आले पाहिजे

संजीव चांदोरकर (२६ नोव्हेंबर २०२५) जुन्या पोस्टवर आधारित

Add Your Heading

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *