• 165
  • 1 minute read

प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही – रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही – रामदास आठवले

प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, त्याचा मला आदर आहे. आंबेडकर हे धूर्त राजकारणी आहेत. आंबेडकर हे निवडणूकीच्या काळामध्ये चांगला खेळ खेळण्यामध्ये अत्यंत एक्सपर्ट आहेत. हे मला जमत नाही. त्यांना जे जमतं ते मला जमत नाही आणि मला जे जमतं ते त्यांना जमत नाही”, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

आठवले पुढे म्हणाले की, ”आंबेडकर वेगळे असले तरी आमच्यात एक गोष्ट चांगली आहे. जशी महायुती आणि महाविकास आघाडी हे एकमेकांवर एवढे आरोप करतात. आमच्यामध्ये आम्ही एवढे आरोप-प्रत्यारोप करत नाहीत. मी कधीही प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाहीय. त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आहे. पण त्यांना मविआमध्ये घेतलं गेलं नाही. त्यांनी मल्लिकार्जून खर्गेंना पत्र लिहून सांगितलं होतं की, मला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे. तरीही मविआने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे स्वबळावर लढण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे.

‘मान-अपमान सहन न करण्यापेक्षा त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. पण त्यांचा उमेदवार निवडून येत नाही, हा त्यांचा पूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे ते निवडणुकीच्या काळात चर्चेत असतात, मी एवढा चर्चेत नसतो”, असंही आठवले यांनी यावेळी सांगितलं. ”त्यांच्यावर आरोप केला जातो की, वंचित बहुजन आघाडी ही ‘बी’ टीम आहे. त्यांनी बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला. नागपुरात ठाकरेंना पाठिंबा दिला. असा प्रश्न आठवलेंना केला असता ते म्हणाले की, ”ते त्यांचे डावपेच आहेत. कुणाला पाठिंबा द्यायचा, कुणाला द्यायचा नाही. कुणाला कुठे उभं करायचं. या गोष्टींमध्ये ते एक्सपर्ट राजकारणी आहेत”

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *