• 168
  • 1 minute read

‘वर्षां’वर शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक, निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

‘वर्षां’वर शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक, निवडणूक आयोगाची कारणे दाखवा नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शनिवारी शिवसेनेच्या सुकाणू समितीची बैठक ‘वर्षां’ बंगल्यावर पार पडली. या बैठकीस शिवसेनेचे मंत्री, आमदार तसेच नेतेही उपस्थित होते. या बैठकीवरून वादंग निर्माण झाला आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षां’वर होत असलेल्या राजकीय बैठकांची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिव आणि विशेष कार्यअधिकारी यांना नोटिसा पाठविल्या असून त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी सोमवारी दिली.

त्याची दखल घेत आयोगाने लगेच मुंबई शहर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रवि कटकधोंड यांनी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव अमोल शिंदे आणि विशेष कार्यअधिकारी व मुलाखत कक्षाचे प्रमुख नितीन दळवी यांना नोटीस बजावत या बैठकीबाबतचा खुलासा मागवल्याची माहिती सूत्रांनी दिली

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *