• 159
  • 1 minute read

नागूतात्याचा बोल खरा ठरला !

नागूतात्याचा बोल खरा ठरला !

नागूतात्या नावाचा माझ्या वडिलाचा एक चुलता होता .Ex. मिलिट्रीमन.देखना, रुबाबदार, करारी आणि तितकाच विक्षिप्त . आपल्या घरातील बायकांनी पाणी भरायला सार्वजनीक पाणवठ्यावर जावू नये म्हणून नागू तात्याने आपल्या छोट्या घरातच आड खोंदला होता .

नागूतात्या गाण्याचा अत्यंत नादी आणि चहाचा अत्यंत तलपी होता . संध्याकाळ झाली की त्याचे डोळे उघडत. त्याचा परीवार मोठा होता. बायका मुले घेऊन तो गावी रहात होता. कटाळ्या सारखे नागूतात्याला ही कोणतेही कामधाम येत नव्हते . इंग्रज मायबाप सरकारने महारांना थोडी शेत जमीन दिली होती , त्यावर आणि किरकोळ उलाढाली करून नागूतात्या आपल्या परिवाराचे पोट भरत होता .

पूर्वी ग्रामीण भागात तमाशा , लेझीम हे एकमात्र करमणुकीचे साधन होते .नागूतात्याला तमाशाचा भारी शौक . रात्र झाली की तमाशातील गाणी मोठ्याने म्हणत तो चावडीत पडे.

माझे वडील सोलापुरला दयानंद कॅालेज मध्ये शिकत होते . दिवाळीच्या सुट्टीत ते गावी आले . घरा समोरील अंगणात वडील आणि त्यांचे मित्र बसले होते . चुलत्याची खवंडळ काढण्याची हुकी वडिलांना आली .’ शुभमंगल चरणी गण नाचला ‘ अशी गण वडिलांनी मोठ्याने म्हटली. नागूतात्या चावडीत पडला होता. “कोण हाय र तो , गण नाचवणारा ?” असे म्हणत नागूतात्या धावत आला.त्याचा चढलेला आवाज , भेसूर झालेला चहरा बघून वडील घाबरले. वडिलांना बघून नागूतात्या म्हणाला ” आर..र..र बापसख्या तू हायस व्हय र ! कोणाच भल झालय गण म्हणून ? झाडाखाली निवांत पुस्तक वाचत बसायच ! जिंदगी भर तुपात रोटी चुरून खाशील .”

वडिलांनी नागू तात्याचा साल्ला ऐकला . नागूतात्याचा बोल खरा ठरला .

– प्रियदर्शी सोनवणे

0Shares

Related post

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

आंबेडकरी विचार, चळवळ व सामाजिक न्याय आंदोनाच्या दयनीय स्थितीस आंबेडकरवादी पक्ष नेतृत्वच जबाबदार….!

वोट चोरी, घोटाळे आणि गैर मार्गाचा अवलंब करून स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीनंतर भाजप नंबर एकचा पक्ष….!…
काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता

काहीही असो सर्वश्री विद्याधर दाते आणि राजू परुळेकर यांनी तत्वज्ञान विषयावर विश्राम घ्यायला हवा होता  …
श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता

श्री.विद्याधर दाते यांनी प्रा. शरद बाविस्करांबद्दलच्या शब्दांवर कायम राहून सकस विवाद घडू द्यायला हवा होता श्री.विद्याधर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *