• 34
  • 1 minute read

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श…

Satish Waghmare सरांच्या लेखणीला झालेला
बुद्धाच्या अनित्यवादाचा स्पर्श …
दिवस बसून राहात नाहीत. बदलतात !

भाकरीवरच्या ‘भीमसही’ची गोष्ट …

गावाकडच्या दुष्काळाला आणि गाववाल्या सरंजामदारांच्या माणुसकीला कंटाळून पोट भरायासाठी रेल्वेने बिनातिकीट दिसेल त्या सायबाच्या हातापाया पडत पुण्यात आलेली आणि मंगळवारपेठ, आरटीओ इकडे झोपड्या टाकून हाताला मिळेल ते काम करणारी दहा पंधरा कुटुंबे लवकरच अतिक्रमण ठरली.

आणि एका सकाळी शासकीय टेम्पो ट्रकने झोपड्या उचकटून चुलीवर शिजत असलेल्या चहासकट, वांगीबटाटा भाजीच्या कालवणासकट , पीठ मळलेल्या काटवट सकट, झोपडीची पोती, काठ्या, चराट दावी आणि त्यांच्या संसारातली दोन दोन जर्मलची भांडी यांची उचलबांगडी करून लक्ष्मीनगरच्या खाणीत ती पंधरा कुटुंबे आणून टाकली.
गावाला कंटाळून आलेल्या, भुकेकंगाल दरिद्री माणसांचे शहरातल्या व्यवस्थेने केलेले हे पहिले ‘वेलकम.’

आंबेडकर जयंतीला रात्रभर जागत निळ्या पताका दोरीला चिकटवताना बोटाला लागलेल्या खळीचा वास. बौद्ध पौर्णिमेला बुद्धासाठी सुजाताने केलेल्या म्हणून आमच्या माय मावश्यांनी केलेल्या तांदळाच्या खिरीचा वास !
आयुष्यातले अनोळखी गोड बाबासाहेबांमूळे माहीत पडले. लहानपणी पाहिलेल्या, अनुभवलेल्या वस्तीतल्या जयंतीतून , गायनपार्टीच्या गाण्यातून बाबासाहेब आमच्यात हळूहळू झिरपत गेले. पुन्हा आयुष्यात पुस्तके आली आणि बाबासाहेब खोलवर रूजले.
मी पाहिलेली जयंती माझी मुले पाहू शकत नाहीत पण ते मी उठायच्या आत हार फुले घेऊन आलेली असतात. बाबासाहेबांना कृतज्ञतेने अभिवादन करतात.
…. त्यांना माहीत आहे, आपण खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे !

0Shares

Related post

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

अखिलेश व तेजस्वीने मोदीलाच सत्तेच्या राजकारणातील पर्याय म्हणून बाद केले…!

भाजपसाठी योग्य नारा : 400 पार नाहीतर 40 च्या आत या देशाची लोकशाही व संविधानाला आम्ही…
एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

एका मतामुळे वाजपेयींचे सरकार पडते तर १२ प्लस मतांची किंमत…?

अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी वाजपेयी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले व विरोधकांनी सरकारच्या…
भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भाजपच्या मुस्लिम विरोधी राजकारणाचा प्रभाव इंडिया आघाडीवर ही असल्याने मुस्लिम समाजाला ग्रहीत धरून डावलले…!

भारतीय संसदीय राजकारणात सर्वाँना हिस्सेदारी/ भागीदारी मिळाली पाहिजे याच भूमिकेतून अनुसूचित जाती, जमातींना राजकीय आरक्षण संविधानाच्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *