मुख्यमंत्रीपदाच्या उंबरठ्यावर विजयने घेतलेला धाडसी निर्णय, जनता भारावली; विरोधकही चक्रावले, अख्खं राज्य नतमस्तक
तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता विजय यांचा मोठा उदय पाहायला मिळत असून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे जनतेत त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला आहे.
चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकणारी महत्त्वाची राजकीय हालचाल डीएमकेकडून करण्यात आल्याचे दिसत आहे. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळालेल्या निकालानंतर 7 मे रोजी झालेल्या डीएमके विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काही महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांमधून पक्षाध्यक्ष एम. के. स्टालिन यांना तातडीचे निर्णय घेण्याचे व्यापक अधिकार देण्यात आले असून राज्यात घटनात्मक स्थिरता राखण्यावर भर देण्यात आला आहे.
डीएमके बहुमताच्या आकड्यापासून दूर राहिल्याने पक्षाच्या भूमिकेत मोठा बदल दिसून येत आहे. थेट सत्तेचा दावा करण्याऐवजी आता डीएमके रणनीतिक सहाय्यक म्हणून भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. तमिळनाडू पुन्हा निवडणुकांसाठी तयार नाही, असे स्पष्टपणे सांगत डीएमकेने चेन्नईत घटनात्मक पेच निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी राजकीय व्यवस्थांसाठी दार खुले ठेवले आहे.