स्वजातीच्या वृथा श्रेष्ठत्वाचा ढोल वाजवणारी जमात..!

स्वजातीच्या वृथा श्रेष्ठत्वाचा ढोल वाजवणारी जमात..!

जगाच्या इतिहासात ज्याच्या हाती लेखणी तो सवाई ठरलेला दिसतो. मागच्या हजार वर्षात भारतात ही लेखणी ब्राम्हणांच्या हातात होती. या लेखणीचा त्यांनी आपल्या जमातीचा उदो उदो करण्यासाठी भरपूर वापरही करून घेतला. ब्राम्हणांनी लिहिलेल्या सर्वच धार्मिक साहित्यात ही बाब प्रकर्षाने जाणवते.
 
मोगलकालीन ब्राम्हण कवी ’तुलसीदासा’ला महान संत म्हणून आपल्या माथी मारण्यात आले आहे. त्याने लिहिलेल्या ’रामचरितमानस’ या ग्रंथातही ब्राम्हण श्रेष्ठत्वाचे तुणतुणे वाजवण्यात आले आहे. या ग्रंथात तो लिहितो,
 
’सापत ताड़त परुष कहंता । 
बिप्र पूज्य अस गावहिं संता ॥ 
पूजिअ बिप्र सील गुन हीना। 
सूद्र न गुन गन ग्यान प्रबीना ॥’
(रामचरितमानस, अरण्यकांड, चौपाई क्रमांक: ३४, ०१)
 
(अर्थ : ब्राम्हण हा शाप देणारा, मारणारा आणि कठोर वचन बोलणारा (शिवीगाळ करणारा) जरी असला, तरी पूजनीय असतो, असे संत म्हणतात; तसेच शील आणि गुणाने हीन असला, तरीही ब्राह्मण पूजनीय असतो; याउलट गुणाने व ज्ञानाने संपन्न असला, तरी शूद्र कधीही पूजनीय नसतो.)
 
या चौपाईच्या माध्यमातून तुलसीदास स्वजातीची किती सरबराई करत आहे ते आपल्या लक्षात आलेच असेल. विशेष म्हणजे तुलसीदास ’नीच ब्राम्हणही पूजनीय असतो’ हे वचन संतांच्या तोंडी घालतो. तो म्हणतो की, ’संत असे म्हणतात.’ आता येथे प्रश्न पडतो, की कोणते रिकामचोट संत असे म्हणत असतील? अर्थातच त्याकाळची ऋषी, आचार्य इ. तथाकथित प्रतिष्ठित भट मंडळीच तुळशीदासाच्या ब्राम्हणस्तुतीला अनुमोदन देत असतील. आजही समाजात तेच तर चालले आहे. कुलकर्णींची संस्था दामलेंना पुरस्कार जाहीर करते. दामले रानडेंच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारतात आणि गायकवाड, गरुड, कांबळे, भोसले प्रेक्षक म्हणून टाळ्या वाजवतात. पहिल्यापासून असाच प्रकार चालू आहे, पण आपल्या लक्षात येतच नाही. आपण या ब्राम्हण स्तवनालाच धर्म – धर्म म्हणून कवटाळून बसलो आहोत.
 
विशेष म्हणजे तुलसीदासासारखा भट साहित्यिकच आपल्या ज्ञातीबांधवांच्या श्रेष्ठत्वाचे तुणतुणे वाजवतो असे नाही, तर ज्यांना – ज्यांना थोर संत, महात्मे म्हणून जाणीवपूर्वक आपल्या माथी मारण्यात आले आहे, ते सारेच भट साहित्यिक असे तुणतुणे वाजवण्यात अग्रेसर आहेत. महाराष्ट्रात सतराव्या शतकातला ’रामदास’ नावाचा भट कवी आपल्या ’दासबोध’ ग्रंथात लिहितो,
 
’ब्राह्मणा सुरवर वंदिती। तेथें मानव बापुडें किती ।
जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य ॥ १५॥
अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन कायी करावा ।
ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तों न घडे कीं ॥ १६॥’
(दासबोध, ५वे दशक, समास: पहिला, श्लोक क्रमांक: १५, १६)
 
(अर्थ : ब्राह्मणांना देवही वंदन करतात, मग बिचाऱ्या सामान्य माणसाची काय कथा? जरी ब्राह्मण मूर्ख बुद्धीचा असला, तरी तो पूजनीय आहे.
नीच जातीचा मनुष्य जरी विद्वान असला, तरी त्याचा उपयोग काय आहे? त्याला ब्राह्मणाइतका मान मिळणे शक्यच नाही.)
 
याठिकाणी तुलसीदास आणि रामदास कसे एकाच तोंडाने बोलत असल्यासारखे भासत आहे. दोघांच्या काळात पंचवीस – तीस वर्षांचा फरक असला, तरी तुलसीदास सध्याच्या उत्तर प्रदेशातला तर रामदास महाराष्ट्रातला. दोघांचा काहीही संबंध नाही. विशेष म्हणजे त्याकाळात सोशल मिडियाही नव्हता की, त्याद्वारे तुलसीदासाने लिहिलेले रामदासाने वाचले असते आणि त्याप्रमाणे आपली रचना केली असती. दोघांचा काडीमात्र संबंध नसतांनाही त्यांच्यात किती ही एकवाक्यता. काय कारण असावे याचे?
 
याचे कारण हे आहे की, ब्राम्हणांनी आपल्या हाती लेखणी आल्यापासून फक्त स्वजातीचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठीच लेखणीचा वापर केला आहे आणि त्यामुळे ब्राम्हणांच्या जनुकांमध्येच आपली टीरी बडवण्याचा गुण आला आहे. या दोघांच्याही पूर्वी अस्तित्वात असलेल्या मनुस्मृती, वेद, उपनिषदे, पुराणे इ. विषमतावादी ग्रंथांत हीच बाब वेगवेगळ्या प्रकारे वारंवार प्रतिपादित केलेली दिसते. हे सारे विषमतावादी – जातीयवादी तथा इतरांना हीन लेखणारे ग्रंथ तुलसीदासानेही वाचले होते आणि रामदासानेही..! 
 
मनुस्मृतीचे पुढील उद्धरण बघा,
 
’अविद्वांश्चैव विद्वांश्च ब्राह्मणो दैवतं महत् ।
प्रणीतश्चाप्रणीतश्च यथाऽग्निर्दैवतं महत् ॥’
(अध्याय : ९, श्लोक ३१७)
(अर्थ : ब्राम्हण मूर्ख असो वा विद्वान असो, ब्राह्मण हा महान देवता आहे. ज्याप्रमाणे अग्नी हवन केलेली असो वा न केलेली असो, ती महान देवता आहे, त्याप्रमाणे ब्राह्मणही जन्माने महान देवता आहे.)
 
यातून हे सिद्ध होते की, ब्राम्हण कसाही असला, तरी तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे हे जनतेच्या मनात ठसवण्यात सारेच ब्राम्हणी साहित्य एकाच माळेचे मणी ठरते. बरं हे साहित्य ब्राह्मणांना सगळ्या मानवप्राण्यांत श्रेष्ठत्व देऊनच थांबत नाही, तर ते देवापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे आणि भुलोकीचे खरेखुरे ईश्वर असल्याचेही ठासून सांगते.
 
मनुस्मृतीतील आणखी एक श्लोक बघा, 
 
’ब्राह्मणो जायमानो हि पृथिव्यामधिजायते।
ईश्वरः सर्वभूतानां धर्मकोशस्य गुप्तये॥’
(अध्याय ०१, श्लोक ९९)
(अर्थ : ब्राह्मण या पृथ्वीवर सर्वोच्च स्थानी जन्माला येतो. तो सर्व प्राणिमात्रांचा स्वामी असतो. धर्माचे रक्षण करणे हे त्याचे काम असते.)
 
मनुस्मृतीत अशा पद्धतीने ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व दर्शविणारे शेकडो श्लोक आलेले आहेत. यासंदर्भात ब्राम्हणी परंपरेतील पुढील उद्धरण खूप प्रसिद्ध आहे,
 
’देवाधीनं जगत् सर्वे, मंत्राधीना च देवता।
ते मंत्रा ब्राह्मणाधीना, तस्मात् ब्राह्मण देवता॥’
 
(अर्थ : संपूर्ण जग देवांच्या अधीन आहे. देव हे मंत्रांच्या अधीन आहेत. मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन आहेत, म्हणून ब्राह्मण हेच देव आहेत.)
 
म्हणजे ब्राम्हणी परंपरा, ब्राम्हणी ग्रंथ स्वतःला देवतांपेक्षाही श्रेष्ठ समजते. भागवत पुराणात तर भृगू नावाचा ब्राम्हण देवांमध्ये सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या विष्णूच्या छातीत लाथ मारतो आणि तरी विष्णू त्याच्यावर न रागावता ’त्याच्या पायांना दुखापत तर झाली नाही ना’ अशी प्रेमळ चौकशी करतांना आणि त्याच्या लाथेने छातीवर झालेली जखम अभिमानाने मिरवतांना दाखवला आहे.
 
मित्रांनो, पृथ्वीतलावर इतिहास व वर्तमानात स्वजमातीच्या नसलेल्या श्रेष्ठत्वाचा इतक्या विकृत पद्धतीने ढोल वाजवणारी आणि त्यासाठी इतर जातींना तथा मराठा – बहुजन समाजाच्या श्रद्धेचा विषय असलेल्या देव – देवतांना तुच्छ लेखणारी दुसरी एखादी जमात असेल काय? स्वजातीच्या अशा श्रेष्ठत्वाच्या दंभातून ब्राम्हणांनी इतिहासात स्री – शूद्र व अतिशूद्रांचे इतके घोर शारीरिक – आर्थिक व मानसिक शोषण केले आहे की त्याला जगाच्या इतिहासात दुसरी तोड सापडणार नाही. इतिहासातील ही सारे सत्य समजून घेणे आणि त्यानुसार आपल्या आजुबाजूला घडत असलेल्या घटनांचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे. जुन्या काळात तुलसीदास आणि रामदास जे विषमतावादी – जातीयवादी काम करत होते, तेच काम आज प्रदीप शर्मा, भागेश्वर बाबा यांसारखे भोंदू करत आहेत. उच्चशिक्षित व मोठमोठ्या शासकीय पदांवर असलेल्या महिला अशोक खरातसारख्या विकृतीच्या नादी का लागतात याची कारणमीमांसा आपण केली पाहिजे ना. याची कारणे भट आपल्याला धर्माच्या नावाखाली जो अधर्म सांगत आहेत आणि त्याचा आधार घेऊन आपल्या जीवनातील दुःख निवारणाच्या नावाखाली जे कर्मकांड, व्रत, वैकल्य, जप, तप, उपवास इ. वृथा बाबी सांगत आहेत त्यात आहे. आज एका अशोक खरातचे कारनामे उघड झाले आहेत, पण आजही पांढरी – भगवी वस्त्रे परिधान करून आणि धार्मिक स्थळांचा संरक्षण कवच म्हणून वापर करणारे शेकडो खरात पडद्याआड बिनबोभाट आपले हिडीस चाळे करतच आहेत. त्यांना उघडं पाडणं आवश्यक आहे.
 
सोशल मिडियाच्या माध्यमातून अधूनमधून भट – ब्राम्हणांच्या अशा बऱ्याच हरामखोऱ्या आता जगासमोर येत आहेत, तरीही समाज अंधभक्तीच्या रांगांमध्ये उन्हातान्हात ताटकळत उभाच आहे. ब्राम्हणांनी स्वतःला तथाकथित धार्मिक साहित्यात देवांपेक्षाही श्रेष्ठ घोषित करण्याच्या कृतीमुळेच समाज आजही त्यांचे पाय धरत असलेला दिसत आहे. भक्तजणांनो.. या भटांचे पाय फक्त मातीचेच नाहीत, तर गटारघाणीने गलिच्छ झालेले आहेत हे सत्य ध्यानात घ्या.
 
त्यामुळे भटांचा आणि त्यांनी धर्माच्या नावाखाली सांगितलेल्या साऱ्या अधार्मिक बाबींचा आपल्या आयुष्यातून त्याग करून खऱ्या अर्थाने विज्ञानवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आयुष्य जगावे हीच विनंती करतो.
 
जय भारत..!
 
 बाळासाहेब गरुड (BG)
 
0Shares

Related post

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

माफसू मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

अनुसूचित जाती, अती मागास जातींच्या सर्वसमावेशक, शाश्वत , प्रगतिशील विकासासाठी राज्य सरकारने बजेट चा कायदा अंमलात…

अनुसूचित जाती, अती मागास जातींच्या सर्वसमावेशक, शाश्वत , प्रगतिशील विकासासाठी राज्य सरकारने बजेट चा कायदा अंमलात…
कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.

कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं.

कोणीतरी हे सांगायची गरज होती. काल राहूल गांधींनी ते रोखठोक सांगून टाकलं. तुम्ही म्हणजे देश नाही.…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *