• 154
  • 1 minute read

शौर्यदिन शांततेत पार पडणार : अमितेश कुमार

शौर्यदिन शांततेत पार पडणार  : अमितेश कुमार

शौर्यदिन शांततेत पार पडणार : अमितेश कुमार

पुणे : एक जानेवारी रोजी होणारा भीमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा अतिशय शांततेत व सौंदार्हपूर्ण वातावरणात पार पडणार असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आंबेडकरी पक्ष संघटनांच्या संयुक्त बैठकीत दिली.
        भीमा कोरेगाव शौर्यदिन कार्यक्रम अनुषंगाने आज पुणे शहरातील विविध पक्ष संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या प्रमुख प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी परभणी व अन्य कोणत्याही ठिकाणच्या घटनांचा तणाव उत्सवाच्या अनुषंगाने नाही. हा उत्सव आंबेडकरी जनता अभिवादनासाठी करत आहे त्यामुळे पोलिसांनी सर्वतोपरी सहकार्य करावी अशी अपेक्षा शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केली. 
        ” भीमा कोरेगाव शौर्यदिन अभिवादन सोहळा हा अत्यंत महत्त्वपूर्ण पण तितकाच संवेदनशील कार्यक्रम असला तरी आता या उत्सवात सर्व नागरिकांचे , स्थानिकांचे सहकार्य असल्याने कायदा सुव्यवस्थेचा कोणताही तणाव नाही तसेच सदर उत्सवात सहभागी होणाऱ्या अनुयायांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करून देणे व अभिवादन सोहळा शांततेत पार पाडणे याला आम्ही प्रथम प्राधान्य दिलेले आहे. मागील वर्षी उत्सवामध्ये घडलेल्या चैन चोरीच्या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबतच्या खबरदारी घेण्याची व त्यासाठी विशेष पथके तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. समाज माध्यमांवर चितावणीखोर व द्वेष मूलक कमेंट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची सूचना सायबर सेल ला दिलेले आहेत व यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत अभिवादन करावे. असे आवाहन यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
         सदर बैठकीस समन्वय समितीचे अध्यक्ष सदर बैठकीला राहुल डंबाळे , डॉ. सिद्धार्थ धेंडे  ,परशुराम वाडेकर ,  ॲड. अरविंद तायडे, बाळासाहेब जानराव , सुनीताताई वाडेकर , सुवर्णाताई डंबाळे , बापूसाहेब भोसले , यशवंत नडघम, मिलिंद आहिरे ,  साईनाथ वाळके पाटील आणि आदी मान्यवर उपस्थित होते
0Shares

Related post

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधी ऐवजी अखिलेश यादव अथवा एम. के स्टॅलिन यांच्याकडे असायला हवे…..!

विरोधकांच्या आघाडीने भक्कम पर्याय उभा केला नाही तर मोदी २०२९ मध्ये ही सत्तेत      …
नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी:  भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा !

नॅशनल स्टॉक एक्सचेंजची (NSE एन एस इ) आकडेवारी: भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीयकरणाचा सांगावा ! एप्रिल २०२६ पर्यंत…

यादवों को ही धार्मिक षडयंत्र का शिकार क्यों बनाया जाता है?

आजकल हिन्दू धर्म के छ: हजार जातियों में सिर्फ यादव जाति को ही महिमा मंडित करते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *