• 156
  • 1 minute read

नाशिकमध्ये लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष?

नाशिकमध्ये  लोकसभेत मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष?

नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा (Maratha) समाजाने दिला आहे. छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमधील मराठा आंदोलकांनी भुजबळांना पाडण्याच प्रण केलाय. याला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

छगन भुजबळांना लोकसभेचं तिकिट मिळाल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तूम्ही एक भूजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे. छगन भुजबळ हे आमेच नेते आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांना उमेदवारी दिली तर आण्ही त्यां्या पाठीशी उभे राहाणार अशी भूमिका प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे. नाशिक जिल्ह्यात 15 टक्के मराठा आणि 60 टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे भुजबळांना पाडणं शक्य नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशाराच प्रकाश अण्णा शेंडगे (Prakash Anna Shendge) यांनी दिलाय.

प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी बहजुन पार्टीच्या (OBC Bahujan Party) उमेदवारांची तिसरी यादी जहीर केली. लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय. बीडमध्ये यशवंत अण्णा गायके, जालन्यात डॉ. तानाजी भोजने, अहमदनगरमध्ये दिलीप खेडकर आणि साताऱ्यात सुरेश कोर्डे यांना उमेवारी जाहीर करण्यात आली आहे. परभणीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी मतात विभाजन नको म्हणून हरिभाऊ शेळके यांनी इथीन आपली उमेदवारी मागे घेतली आहे. 

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *