• 26
  • 1 minute read

भान

भान

ते सत्तेत
आहेत
हे सत्य आहे
हे मान्य केले
पाहिजे

सर्व जगात
पोहचलेल्या
बुद्धालाही
त्यांनी केले होते
अदृश्य या भूमीत

त्या तुलनेने
संविधान
त्यांच्यासाठी आहे
हातचा मळ!
म्हणून आम्ही
उगीच भ्रमात
राहू नये

आमच्या कवितेतील
सूर्य, चंद्र नि तारे
उपाशी मरू लागले
की तेही जातील
शरण त्यांना
बिनशर्त!
(किंवा जमा होतील
कबरीत)
आठवले,
कवाडे नि जाधव
जसे गेले

शब्दातील मुजोरीने
कुणीच जिंकले नाही
युद्ध आजवर
युद्धाचे रथचक्र
रक्ताच्या इंधनावर
चालत असते
याचे भान असावे
अन् उद्या होणा-या
तुंबळ युद्धासाठी
जोडत जावे माणसं
आपल्या मनातील
भिंती पलीकडचे.

– प्रा माधव सरकुंडे.

0Shares

Related post

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत कांबळे करतांना दिसत आहेत.

सध्या वेब जगतात असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग लेखक – निर्माता परेश त्रिवेदी आणि दिग्दर्शक संतोष गणपत…

सध्या भारतीय वेब विश्वात धमाकेदार प्रयोग होतांना दिसताहेत. एका बाजुला हिंदी इंडस्ट्रीतल्या मात्तब्बर निर्मात्यांच्या बिग बजेट…
स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

स्मार्ट मीटर्स, स्मार्ट प्रोजेक्ट ! कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !!

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने “नॅशनल स्मार्ट ग्रीड मिशन” या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशभर स्मार्ट मीटर्स अथवा…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांची राजावाडी हॉस्पिटलला भेट, जखमींची केली विचारपूस. मुंबई, दि. १४ मे २०२४घाटकोपरमध्ये एक…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *