• 120
  • 1 minute read

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.

महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाकडून प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध.
           संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण भाऊ गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारधारेचा प्रसार करणाऱ्या आणि बहुजन समाजातील तरुणांना पुरोगामी बनवण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हा हल्ला केवळ व्यक्तीगत नसून, सामाजिक समता आणि प्रबोधनाच्या विचारांवरच आघात आहे, असे मोर्चाने म्हटले आहे.महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचेप्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे] यांनी या घटनेचा जाहीर निषेध करताना सांगितले, “प्रवीण गायकवाड यांनी बहुजन समाजाला वैचारिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यावरील हल्ला हा समाजातील प्रगतिशील विचारांना दडपण्याचा कुटील डाव आहे. आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की, हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करून दोषींना कायद्याच्या कठोर चौकटीत आणावे.”सोशल मीडियावरही या घटनेचा व्यापक निषेध होत असून, अनेकांनी हा हल्ला शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर आघात असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना एकजुटीने या कृत्याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाने पुढील काही दिवसांत राज्यभर निषेध सभा आणि आंदोलने आयोजित करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल आणि समाजात समता व न्याय प्रस्थापित होईल.प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि प्रवीण गायकवाड यांना संरक्षण द्यावे, अशी मागणीही मोर्चाने केली आहे.
 संजय बागुल, पितांबर अहिरे, वाल्मीक जाधव, अजय बि-हाडे, सचिन बि-हाडे, सुनील सपकाळे, सोमा भालेराव, संजय सोनवणे ,महिंद्र केदारे,दिनेश सोये,भारत सोनवणे, दत्तू सोनवणे, वसीम शेख ,दिलीप सपकाळे, भैय्या सपकाळे, जगदीश सपकाळे, आधार सपकाळे गुरुजी इत्यादी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
0Shares

Related post

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!

सरदार पटेलांवर संघ आणि गोलवलकरांचा प्रभाव नसता तर म. गांधींचे प्राण वाचले असते……!      …
पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और पाक से सौदा किया था….!

पंडित नेहरू ही थे जिनके वजह काश्मिर मिला, नहीं तो संघ, सावरकर और मुखर्जीने राजा और…

बार बार काश्मीर की चर्चा मुख्य मुद्दों से भागने का सबसे बडा प्रयास…..!      …
शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : संक्षिप्त जीवन परिचय के साथ कुछ यादगार अनुभव*

शूद्र शिवशंकर सिंह यादव : मैं अपने खानदान का पहला व्यक्ति था, जो पढ़ाई शुरू किया…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *